शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनच्या प्रतीक्षेत देश तहानलेलाच; जून महिन्यात ३७ टक्के कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 06:33 IST

हवामान खात्याने नऊ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 

नवी दिल्ली : यावर्षी मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे संपूर्ण देशाला घाम फुटला आहे. ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळामुळे गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पावसाने थैमान माजविले आहे.

इशान्येकडील राज्यांमध्ये पूर आला आहे. त्याचवेळी उर्वरित देश पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांत सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील ५४ आणि बिहारमधील ४४ जणांचा समावेश आहे. हवामान खात्याने नऊ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 

‘बिपोरजॉय’ चक्रीवाळामुळे मान्सून काही दिवसांपासून तळकोकणातच रेंगाळला आहे. तोदेखील हळूहळू पुढे सरकणार आहे. त्यामुळे पावसासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षाच आहे. २३ ते २९ जून या काळात तळकोकणसहित संपूर्ण कोकण व गोवा उपविभागात मान्सून अधिक सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

या राज्यांना उष्णतेचा फटकाउत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या राज्यांमध्ये आतापर्यंत मान्सून दाखल होतो. यावेळी पावसासाठी ही राज्ये आतुरलेली आहेत.

या राज्यांना पावसाचा तडाखाअरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि सिक्कीम या ईशान्येकडील राज्यांमध्येही पाऊस पडत आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदी दुथडी भरून वाहत आहे. १३ जिल्ह्यांतील ३८ हजारांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. केरळमध्ये पावसाने हजेरी लावली असून तेथे संततधार सुरू आहे. तर तामिळनाडूच्या काही भागात पावसाने हजेरी लावली.

उष्णतेच्या लाटेत ९८ मृत्यूउत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात १५, १६ आणि १७ जून रोजी ४०० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील बहुतेकांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. येथील तापमान ४४ अंशांच्या आसपास नोंदवले गेले आहे. बिहारमध्ये सहा जिल्ह्यांमध्ये रेड तर आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बिहार आणि झारखंडमध्ये सर्व शाळा तसेच अंगणवाड्यांना २४ जूनपर्यंत सुटी जाहीर केली आहे. 

आंतरराज्य स्पर्धेत धावपटू पडली बेशुद्धओडिशामध्ये उष्णतेच्या लाटेत पहिल्या मृत्यूची अधिकृत नोंद झाली. आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारला मिळाली आहे, ज्यात बालासोर जिल्ह्यातील एक मृत्यूचा समावेश आहे. इतर मृत्यूंचा तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. येथे आंतरराज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत महिला धावपटू तेजस्विनी शंकर उष्णतेमुळे बेशुद्ध पडली. 

टॅग्स :Heat Strokeउष्माघातRainपाऊस