शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

मान्सूनच्या प्रतीक्षेत देश तहानलेलाच; जून महिन्यात ३७ टक्के कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 06:33 IST

हवामान खात्याने नऊ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 

नवी दिल्ली : यावर्षी मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे संपूर्ण देशाला घाम फुटला आहे. ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळामुळे गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पावसाने थैमान माजविले आहे.

इशान्येकडील राज्यांमध्ये पूर आला आहे. त्याचवेळी उर्वरित देश पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांत सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील ५४ आणि बिहारमधील ४४ जणांचा समावेश आहे. हवामान खात्याने नऊ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 

‘बिपोरजॉय’ चक्रीवाळामुळे मान्सून काही दिवसांपासून तळकोकणातच रेंगाळला आहे. तोदेखील हळूहळू पुढे सरकणार आहे. त्यामुळे पावसासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षाच आहे. २३ ते २९ जून या काळात तळकोकणसहित संपूर्ण कोकण व गोवा उपविभागात मान्सून अधिक सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

या राज्यांना उष्णतेचा फटकाउत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या राज्यांमध्ये आतापर्यंत मान्सून दाखल होतो. यावेळी पावसासाठी ही राज्ये आतुरलेली आहेत.

या राज्यांना पावसाचा तडाखाअरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि सिक्कीम या ईशान्येकडील राज्यांमध्येही पाऊस पडत आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदी दुथडी भरून वाहत आहे. १३ जिल्ह्यांतील ३८ हजारांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. केरळमध्ये पावसाने हजेरी लावली असून तेथे संततधार सुरू आहे. तर तामिळनाडूच्या काही भागात पावसाने हजेरी लावली.

उष्णतेच्या लाटेत ९८ मृत्यूउत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात १५, १६ आणि १७ जून रोजी ४०० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील बहुतेकांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. येथील तापमान ४४ अंशांच्या आसपास नोंदवले गेले आहे. बिहारमध्ये सहा जिल्ह्यांमध्ये रेड तर आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बिहार आणि झारखंडमध्ये सर्व शाळा तसेच अंगणवाड्यांना २४ जूनपर्यंत सुटी जाहीर केली आहे. 

आंतरराज्य स्पर्धेत धावपटू पडली बेशुद्धओडिशामध्ये उष्णतेच्या लाटेत पहिल्या मृत्यूची अधिकृत नोंद झाली. आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारला मिळाली आहे, ज्यात बालासोर जिल्ह्यातील एक मृत्यूचा समावेश आहे. इतर मृत्यूंचा तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. येथे आंतरराज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत महिला धावपटू तेजस्विनी शंकर उष्णतेमुळे बेशुद्ध पडली. 

टॅग्स :Heat Strokeउष्माघातRainपाऊस