शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भारी: आता कुठूनही करता येईल मतदान; स्थलांतरित मतदारांसाठी रिमोट ईव्हीएम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 09:39 IST

नोकरी व व्यवसायानिमित्ताने गृहराज्य सोडून इतरत्र वास्तव्य करणाऱ्यांना आता मतदानासाठी गृहराज्यात जाण्याची गरज राहणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: नोकरी व व्यवसायानिमित्ताने गृहराज्य सोडून इतरत्र वास्तव्य करणाऱ्यांना आता मतदानासाठी गृहराज्यात जाण्याची गरज राहणार नाही. स्थलांतरित मतदारांना वास्तव्य असलेल्या ठिकाणाहून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रणाली केंद्रीय निवडणूक आयोगाने विकसित केली आहे.

स्थलांतरणामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागते. स्थलांतरित मतदारांची संख्या अधिक  आहे. ही स्थिती योग्य नसून, विज्ञान युगात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याची आवश्यकता असल्याचे निवडणूक आयोगाने या पथदर्शी प्रकल्पाची संकल्पना मांडताना म्हटले आहे. देशातील स्थलांतरित मतदारांची अचूक माहिती उपलब्ध नसल्याचे कबूल करून निवडणूक आयोगाने म्हटले आहे, की, लग्न, शिक्षणामुळे अनेकांना स्थलांतरित व्हावे लागते. 

जवळपास ८५ टक्के स्थलांतरित मतदार हे आपल्याच राज्यात दुसरीकडे वास्तव्याला राहतात. हा प्रकल्प राबविण्यात निवडणूक आयोगाला कायदेशीर, प्रशासकीय व तांत्रिक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. यासाठी निवडणूक कायद्यात बदल करावे लागणार आहेत. तसेच मतदार कोण, याची व्याख्या निश्चित करावी लागणार आहे.

१६ जानेवारीला प्रात्यक्षिक दाखविणार

- या प्रायोगिक प्रकल्पाचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना पाचारण केले आहे. एकाच रिमोट ईव्हीएम मतदान केंद्रातून ७२ मतदारसंघांसाठी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध होईल, असा दावाही निवडणूक आयोगाने केला आहे. 

- निवडणूक आयोगाने ८ राष्ट्रीय राजकीय पक्ष व ५७ प्रादेशिक पक्षांना येत्या १६ जानेवारीला प्रात्यक्षिक पाहण्यासाठी पाचारण केले आहे. यात रिमोट ईव्हीएमद्वारे मतदान कसे होईल, हे स्पष्ट होणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग