शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

मतदार कमी होणार-मस्ट-अवश्य वापरावी

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

तब्बल २१ लाख मतदार

तब्बल २१ लाख मतदार
कमी होण्याची शक्यता

- आयोगाकडून नोटीस : १ ऑक्टोबरपर्यंत उत्तर अपेक्षित
मुंबई : राज्यातील मतदार याद्यांमधून तब्बल २१ लाखांहून अधिक मतदार कमी होण्याची शक्यता आहे. दोन ठिकाणी नावे असलेले, स्थानांतर झालेले किंवा मृत झालेल्या मतदारांचा त्यात समावेश आहे.
निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन या संबंधी माहिती गोळा करण्यात आली आणि वरील प्रकारची २१ लाख ४० हजार ९५४ नावे काढण्यात आली. आता या सर्वांना किंवा त्यांच्या घरी नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यांची नावे मतदार यादीतून का वगळू नयेत, अशी विचारणा नोटीशीत करण्यात आली आहे. या नोटीशींचे उत्तर १ ऑक्टोबरपर्यंत स्वीकारण्यात येईल.
स्पष्टीकरण समाधानकारक नसेल तर नाव यादीतून वगळले जाईल. आयोगाने आपल्या वेबसाईटवरही ही नावे टाकली आहेत. ज्या जिल्‘ांमधील सर्वाधिक नावे वगळण्याचे प्रस्तावित आहे. त्यात पुणे, ठाणे, नाशिक, मुंबई उपनगर, पालघर आदींचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)
-----------------------------------
प्रस्तावित यादी
कोणत्या जिल्‘ात किती मतदार वगळण्याचा प्रस्ताव आहे याबाबतची आकडेवारी अशी - नंदूरबार - ३१३३५, धुळे - १०३५२, जळगाव - २६२०२, बुलडाणा - ९९०३, अकोला - ७८१९, वाशीम- ३८२९, अमरावती - २९६००, वर्धा - ५८७७, नागपूर - २२२२७, भंडारा - ५६६३, गोंदिया - ४०२, गडचिरोली - ६०३०, चंद्रपूर - ४८८१, यवतमाळ - २७८५९, नांदेड - ६३०२९, हिंगोली - ५६४४, परभणी - ४७६४, जालना - ५१०६, औरंगाबाद - ३४८११, नाशिक - १७३५००, पालघर -५४६०९, ठाणे -३७४१४२, मुंबई उपनगर - ९०२५४०, मुंबई शहर - २१२५३, रायगड - १६२५५, पुणे - १३२१७८, अहमदनगर - १२९८२, बीड - ४९४७, लातूर - १०३७८, उस्मानाबाद - ९२२१, सोलापूर - ३४६८५, सातारा - ३५४८१, रत्नागिरी - २८१९८, सिंधुदुर्ग - ५११४, कोल्हापूर - २३१३८. एकूण - २१,४०,९५४.
-----------------------------------