शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 06:52 IST

आयोगाला विचारले, काय कारवाई केली? विजय सिन्हा यांना द्यावे लागले स्पष्टीकरण

पाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्याकडे दोन वेगवेगळी मतदार ओळखपत्र असून, त्यांची दोन मतदारसंघात नाव असल्याचा आरोप रविवारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केला. एकतर निवडणूक आयोगाने फसवणूक केली आहे किंवा कुमार सिन्हा हे खोटे असल्याचे ते म्हणाले. दोन ओळखपत्र (ईपीआयसी) असलेल्या सिन्हा यांच्यावर काय कारवाई केली, असा सवाल करत तेजस्वीनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.

सिन्हा यांचे नाव लखीसराय विधानसभा मतदारसंघात व पाटणा जिल्ह्यातील बांकीपूर विधानसभा क्षेत्रात आहे. लखीसरायमध्ये त्यांचा ईपीआयसी-क्रमांक 'आयएएफ ३९३९३३७' आहे, तर बांकीपूरमध्ये त्यांचा ओळखपत्र क्रमांक 'एएफएसए ०८५३३४१' असल्याचा दावा तेजस्वीनी केला. एवढेच नाही तर दोन्ही मतदार याद्यांमध्ये त्यांचे वय वेगवेगळे दाखवले असून, ते अनुक्रमे ५७ व ६० वर्षे असे आहे. हा प्रकार मुद्दाम केला आहे.

उपमुख्यमंत्री सिन्हांचे स्पष्टीकरण

पूर्वी माझे नाव बांकीपूर मतदारसंघात होते. एप्रिल २०२४ मध्ये लखीसरायमध्ये नाव स्थलांतरित करण्याचा अर्ज करत बांकीपूरहून नाव वगळ्याचादेखील फॉर्म भरला होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळे बांकीपूरममधील नाव काढले गेले नाही. त्यामुळे माझे नाव दोन वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहे. असे असले तरी मी एकाच ठिकाणी मतदान केल्याचा दावा सिन्हा यांनी केला.

नियम फक्त विरोधी नेत्यांसाठीच आहेत का?

सिन्हा यांचे वय एका यादीत ५७ वर्षे असून दुसऱ्या यादीत ६० वर्षे दाखवले आहे. ही फसवणूक नाही का? वयाचा घोटाळा तर नाही? त्यांनी दोन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांसाठी दोन वेगवेगळ्या फॉर्म भरले असावेत. जाणूनबुजून दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेगवेगळे मतदान नोंदणी केले आहेत. जर त्यांनी स्वतः दोन्ही फॉर्म्सवर स्वाक्षरी केली नसेल तर, निवडणूक आयोगाने बनावट स्वाक्षरींवरून त्यांच्यासाठी दोन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन कार्ड तयार केलीत का? त्यांना दोन वेगवेगळ्या नोटिस दिल्या जातील का, की हे नियम फक्त विरोधी नेत्यांसाठीच आहेत? असा यादव यांनी आरोप केला.

कोणाचीही नावे पूर्वसूचनेशिवाय यादीतून काढली जाणार नाहीत

बिहारमधील मसुदा मतदार यादीतून कोणाचेही नाव पूर्वसूचना न देता वगळण्यात येणार नाही. नाव यादीतून काढण्यापूर्वी मतदाराला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर वैध कारण आढळून आले तरच मतदार यादीतून त्याचे नाव वगळण्यात येणार असल्याचे शनिवारी निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना स्पष्ट केले.

मतदार याद्यातील विशेष सखोल पुनरीक्षणाविरोधात (एसआयआर) दाखल याचिकांवर न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी सुरू असताना आयोगाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी १ ऑगस्ट रोजी आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मसुदा मतदार यादीत ७.२४ कोटी लोकांची नावे असली तरी त्यातून जवळपास ६५ लाखांहून अधिक नागरिकांची नावे वगळण्यात आली.

मसुदा यादीतून नाव निघाले म्हणजे ते कायमस्वरूपी वगळण्यात आले, असे समजायचे कोणतीही कारण नाही. नियमानुसार मतदार यादीतून काढलेल्या नावांची वेगळी यादी प्रसिद्ध करण्याची गरज नाही. कोणाची नावे यादीतून काढण्यात आली, यासंदर्भात राजकीय पक्षांनादेखील कल्पना दिली आहे. त्यासाठी राजकीय पक्षांना बूथस्तरावर अशा मतदारांची माहिती दिल्याचा दावा आयोगाने केला आहे. 

टॅग्स :BiharबिहारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगTejashwi Yadavतेजस्वी यादव