शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
3
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
4
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
5
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
6
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
7
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
8
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
9
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
10
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
11
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
12
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
13
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
14
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
15
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
16
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
17
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
18
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
19
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
20
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?

'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 14:30 IST

Voter Adhikar Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी मत चोरीच्या मुद्द्यावरुन निवडणूक आयोग आणि सरकारवर सातत्याने टीका करत आहेत.

Rahul Gandhi Voter Adhikar Yatra:काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजदचे तेजस्वी यादव सध्या व्होट अधिकार यात्रेनिमित्त बिहारचा दौरा करत आहेत. आपल्या यात्रेदरम्यान, राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करत आहेत. आजही अररिया येथे दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राहुल यांनी पुन्हा एकदा आरोप केला की, देशभरात मते चोरीला जात आहेत आणि निवडणूक आयोग यावर गप्प आहे. तर, तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाला "गोदी आयोग" म्हटले.    

राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला प्रश्न 

राहुल गांधी म्हणाले की, आता कोट्यवधी लोक असे मानतात की, मते चोरीला जात आहेत. आम्ही कर्नाटक, महाराष्ट्र आणि हरियाणामधील मतदार यादी मागितली, पण दिली नाही. मते कशी चोरीला जातात, हे आम्ही कर्नाटकात दाखवून दिले. मात्र, आम्ही बिहारमध्ये हे होऊ देणार नाही. मी कर्नाटकातील महादेवपुरा संबंधित डेटा ठेवला आणि निवडणूक आयोगाला विचारले की, १ लाख बनावट मतदार कुठून आले? निवडणूक आयोगाचे उत्तर अद्याप आलेले नाही. 

निवडणूक आयोगाने मला प्रतिज्ञापत्र मागितले, मात्र आयोगाने अनुराग ठाकूर यांना प्रतिज्ञापत्र मागितले नाही. मी बनावट मतदारांबद्दल बोललो, अनुराग ठाकूर यांनीही तेच सांगितले, परंतु निवडणूक आयोगाने त्यांना प्रतिज्ञापत्र न मागणे हे दर्शविते की, निवडणूक आयोग तटस्थ नाही. बिहारमधील SIR ही संस्थात्मक मत चोरीची एक पद्धत आहे. बिहारमध्ये ६५ लाख लोकांची नावे वगळण्यात आली, परंतु भाजप एकही तक्रार करत नाही. कारण निवडणूक आयोग, निवडणूक आयुक्त आणि भाजप यांच्यात भागीदारी आहे, अशी टीका राहुल यांनी केली.

निवडणूक आयोग भाजपचा कार्यकर्ता- तेजस्वी यादव तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हणाले, आता निवडणूक आयोग एक लॅपडॉग आयोग बनला आहे. ते भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पूर्णपणे संपली आहे. आजपर्यंत आम्ही इतका खोटारडा पंतप्रधान कधीच पाहिला नाही. अफवा पसरवणे हे त्यांचे काम आहे. जेव्हा ते बिहारमध्ये आले तेव्हा त्यांनी घुसखोरांचा उल्लेख केला, परंतु निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात घुसखोराचे एकही नाव नाही, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रBiharबिहार