शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कलम 370 रद्द करताना स्थानिकांचा आवाज ऐकायला हवा होता- मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 8:04 AM

आठवड्याभरानंतर मनमोहन सिंग यांचं कलम 370 वर भाष्य

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधूनकलम 370 कलम रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर आठवड्याभरानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भाष्य केलं. भारताच्या एकात्मतेची संकल्पना कायम राहण्यासाठी कलम 370 हटवताना स्थानिकांचा आवाज ऐकायला हवा होता, असं मनमोहन सिंग म्हणाले. सध्या भारत अडचणीतून जात असून त्यातून बाहेर पडण्यासाठी समविचारी लोकांचं सहकार्य आवश्यक असल्याचंदेखील सिंग यांनी म्हटलं. स्थानिकांशी संवाद साधून कलम 370 बद्दलचा निर्णय घ्यायला हवा होता. त्यामुळे भारतीयत्वाची पवित्र संकल्पना आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि आम्ही ती टिकवत आहोत, असा संदेश गेला असतो, असं सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. कलम 370 हटवल्यानंतर मनमोहन सिंग यांनी प्रथमच त्यावर भाष्य केलं. सिंग यांच्या मंत्रिमंडळातील माजी सहकारी एस. जयशंकर रेड्डी यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या सोमवारी (5 ऑगस्टला) मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू-काश्मीरची पुनर्रचना केली. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती. जेणेकरून इथे राहणाऱ्या लोकांना स्वतःचे उद्देश पूर्ण करता येतील. तर जम्मू-काश्मीरला वेगळ्या केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा राहणार आहे.  

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरManmohan Singhमनमोहन सिंगladakhलडाख