शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असेल जनतेचा आवाज; ज्येष्ठ नेते लोकांशी संपर्क करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 06:43 IST

पक्षाने दिले ‘जन आवाज’ नाव; १ नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे नेते नागपूरमध्ये

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा देशातील जनतेच्या ‘मन की बात’वर तयार होईल व पक्षाने त्याला ‘जन आवाज’ असे नाव दिले आहे. त्याअंतर्गत पक्षाचे नेते देशभर लोकांशी संवाद साधून त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेतील, काँग्रेसकडून त्यांना काय अपेक्षा आहेत व २०१९ मध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली तर त्यांना कशा प्रकारचे सरकार हवे आहे म्हणजेच त्यांची प्राथमिकता काय असेल, कोणत्या प्रकारच्या योजना तयार केल्या जाव्यात, अशी काँग्रेसची भूमिका आहे.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या या विचारांना प्रत्यक्ष रूप देण्यासाठी पक्षाचे २२ वरिष्ठ नेते वेगवेगळ्या शहरांत जाऊन लोकांशी थेट संपर्क साधत आहेत. मुंबई, चंदीगढसह अनेक शहरांत याची सुरवातही झाली आहे. एक नोव्हेंबर रोजी नागपूरमध्ये हे नेते असतील. एक आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेने काँग्रेसला व्यापक यश मिळाले आहे व त्यामुळे ही मोहीम अधिक वेगवान बनवण्यात आली आहे व डिसेंबरअखेर ती पूर्ण करण्याचा पक्षाचा विचार आहे. दरम्यान, देशातील लोकांशी वेगवेगळ्या विषयांवर ज्या सूचना आणि सल्ला मिळेल त्याला निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट केले जाईल.थेट संवादाच्या या प्रक्रि येला पक्षाने दोन भागांत विभागले आहे. एक बंद खोलीतील संवाद आणि खुली चर्चा. जे लोक थेट संवादात सहभागी होऊ शकणार नाहीत ते व्हॉट्सअ‍ॅप किंवा ईमेलद्वारे पक्ष नेतृत्वाला आपल्या सूचना कळवतील. पक्षाचे नेते पी. चिदम्बरम आणि राजीव गौडा यांनी या उद्देशाने संकेतस्थळही (वेबसाईट) सुरू केले आहे व लोकांना आवाहन केले की ७२९२०८८२४५ या क्रमांकावर आपल्या सूचना व्हॉट्सअ‍ॅप कराव्या.इतिहासात असा प्रयोग पहिल्यांदाचपक्षाचे जे २२ नेते वेगवेगळे गट बनवून एकूण १३०-१४० शहरांत ज्या काही सूचना एकत्र करतील त्या येत्या जानेवारी महिन्यात पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट होतील.आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने थेट लोकांशी जोडले जाता येईल असा हा काँग्रेसच्या इतिहासात असा प्रयोग पहिल्यांदाच केला जात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९