शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Farmers Protest : "नेता बनण्याच्या चढाओढीत शेतकऱ्यांचे मुद्दे पडले मागे, चांगलं काम करण्यासाठी देवा यांना सबुद्धी दे"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 4:06 PM

Farmers Protest : शेतकरी आंदोलनात राजकारण केलं जात आहे. तसेच आंदोलनात कुठेतरी आता शेतकऱ्यांचे मुद्दे मागे पडले आहेत. नेता बनण्याच्या चढाओढीत शेतकऱ्यांचे मुद्देच नेतेच विसरून गेले, असं व्ही. एम. सिंग यांनी म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर (Farmers Protest) राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. सिंग यांनी मोठं विधान केलं आहे. शेतकरी आंदोलनात राजकारण केलं जात आहे. तसेच आंदोलनात कुठेतरी आता शेतकऱ्यांचे मुद्दे मागे पडले आहेत. नेता बनण्याच्या चढाओढीत शेतकऱ्यांचे मुद्देच नेतेच विसरून गेले, असं व्ही. एम. सिंग यांनी म्हटलं आहे. 

"शेतकऱ्यांच्या हितात काही चांगली कामं करण्यासाठी देवा यांना थोडी सबुद्धी दे. किमान आपलंही आणि शेतकऱ्यांचं तरी भलं करतील. नेत्यांनी शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे. आंदोलन योग्य दिशेने नेले पाहिजे. पण नेता बनण्याच्या चढाओढीत राहण्यापेक्षा शेतकऱ्यांचे मुद्दे पुढे नेले पाहिजेत" असं व्ही. एम. सिंग यांनी म्हटलं आहे. "ऑगस्ट क्रांतीच्या दिवशी म्हणजे 9 ऑगस्टला शेतकरी आंदोलनाचा आवाज आपण उठवला होता. शेतकऱ्यांचं रक्षण व्हावं आणि त्यांच्या कुटुंबाचा फायदा व्हाव, हे आपलं ध्येय असतं."

"शेतकऱ्यांना मार खाऊ घालणं किंवा त्यांना मरणासाठीचा आपला प्रयत्न कधीच राहिलेला नाही. 26 जानेवारीला दिल्लीत जे काही झालं त्यानंतर आपण आंदोलनातून बाहेर पडलो. कारण आंदोलनाला जे स्वरुप दिले गेले ते योग्य नव्हते" असं सिंग यांनी म्हटलं आहे. तसेच "आम्ही शेतकऱ्यांच्या उज्जल भवितव्यासाठी काम करत आलो आहोत, करणार आणि करत राहणार. शेतकऱ्यांचा गहू एमएसपीवर विकण्याचे काम करत आहोत. आमच्या लोकांवर गुन्हेही दाखल केले गेलेत" असं देखील व्ही. एम. सिंग यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीIndiaभारत