विठ्ठलाला दीड कोटीच्या देणग्या

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:10+5:302015-08-02T22:55:10+5:30

आषाढी यात्रा : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला २.२१ कोटींचे उत्पन्न

Vitthalala donates Rs.1.5 crores | विठ्ठलाला दीड कोटीच्या देणग्या

विठ्ठलाला दीड कोटीच्या देणग्या

ाढी यात्रा : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला २.२१ कोटींचे उत्पन्न
सचिन कांबळे / सुनील शिवशरण
पंढरपूर :
पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणी आषाढीच्या कालावधीत दक्षिणापेटीत ३९ लाख ८ हजार १७ रुपये, तर देणगीद्वारे १ कोटी २० लाख ९८ हजार ७८८ रुपये असे एकूण १ कोटी ६० लाख ६ हजार ८०५ रुपयांचे दान भाविकांनी अर्पण केले.
यंदा १२ लाख भाविकांनी आषाढीला पंढरीत हजेरी लावली. आषाढी यात्रेत आलेल्या भाविकांनी विठ्ठलाच्या चरणावर ३२ लाख ६७ हजार ६३६ रुपयांचे तर रुक्मिणी मातेच्या पायावर ६ लाख ४० हजार ३८१ रुपयांचे दान अर्पण केले. तसेच अन्नछत्रासाठी ८३ हजारांची देणगी तर विठ्ठल-रुक्मिणीला १ कोटी २० लाख ९८ हजार ७८८ देणगी दिली आहे. विविध वस्तू व साहित्य विक्रीतून मंदिर समितीला ६१ लाख ८० हजार ७२० रुपयांचे उत्पन्न मिळाले.
विठ्ठल-रुक्मिणीला दान व देणगीतून १ कोटी ६० लाख ६ हजार ८०५ रुपये व प्रसाद व वस्तूंच्या विक्रीतून ६१ लाख ८० हजार ७२० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे यंदाच्या वर्षी मंदिर समितीला २ कोटी २१ लाख ८७ हजार ५२५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
कोट -
विठ्ठल-रुक्मिणी मातेला मागील वर्षी २ कोटी १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी २ कोटी २१ लाख ८७ हजार २५२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यंदाच्या वर्षी ८ लाख ८७ हजार ५२५ रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले आहे.
- शिवाजी कादबाने
कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूऱ

चौकट
दहा दिवसांत रेल्वेला कोटीचा फायदा
आषाढी यात्रा कालावधीत विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी येणार्‍या भाविकांची सोय व्हावी म्हणून मध्य रेल्वे विभागाने जादा गाड्यांच्या १०२ फेर्‍या केल्या. यातून २ लाख १९ हजार भाविकांनी प्रवास केल्याने रेल्वेला १ कोटी २ हजार २०३ रुपयांचे उत्पन्न मिळाले. केवळ दहा दिवसांच्या काळात रेल्वेला हे वाढते उत्पन्न मिळाले.

Web Title: Vitthalala donates Rs.1.5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.