शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: डिस्चार्ज मिळताच विश्वासकुमारने भावाच्या मृतदेहाला दिला खांदा; दोघेही जात होते लंडनला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:33 IST

अहमदाबाद विमान अपघातात जखमी झालेले विश्वास कुमार भावाच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

Ahmedabad Air India Plane Crash:अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात कोसळले आणि मोठी जीवितहानी झाली. विमानातील प्रवाशांसह २७० जणांचा या अपघातात भीषण मृत्यू झाला. मात्र या अपघातातून विमानातील केवळ एकच प्रवासी वाचला आहे. अहमदाबादमधीलएअर इंडियाच्या विमान अपघातात विश्वास कुमार रमेश हे एकमेव प्रवासी बचावले. विमानातील उर्वरित २४१ जणांचा मृत्यू झाला. दुर्दैवाने या मृतांमध्ये विश्वास कुमार यांचा भाऊ देखील होता. रुग्णालयातून डिस्चार्च मिळाल्यानंतर विश्वास कुमार यांनी भावाच्या अंत्ययात्रेमध्ये सहभाग घेतला. यावेळी विश्वास कुमार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. एअर इंडियाच्या एआय १७१ बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर या विमानात लंडनला जाणाऱ्या २४२ जणांपैकी फक्त एक प्रवासी वाचला होता ४० वर्षीय ब्रिटिश-भारतीय नागरिक रमेश ११ए क्रमांकाच्या सीटवर बसला होते. विश्वास कुमार या भयानक अपघातातून वाचले तर त्यांचा धाकटा भाऊ अजय कुमार रमेश यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातून उपचार घेऊन परतल्यानंतर विश्वास कुमार भावाच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते.

विश्वास कुमार यांनी सांगितले होते की उड्डाणानंतर ३० सेकंदांनी मोठा आवाज झाला आणि विमान कोसळले. सर्व काही इतक्या लवकर घडले की काहीही समजले नाही. विश्वास कुमार हे ११ ए या आपत्कालीन एक्झिटजवळ बसले होते. विमान कोसळ्यानंतर त्यातून बाहेर पडत विश्वास कुमार यांनी आपला जीव गमावला होता. विश्वास कुमार यांचा भाऊ अजय ११ जे सीटवर बसला होता. तो या अपघातातून वाचू शकला नाही. दोन्ही भाऊ दीव येथून कुटुंबाला भेटून लंडनला परतत होते. विश्वास कुमार यांनी रुग्णालयातून त्यांच्या भावाचा शोध घेतला मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. अजयच्या दीवमधील अंतिम यात्रेदरम्यान विश्वास कुमारने त्याला खांदा दिला. विश्वास कुमार याच्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप कठीण क्षण होता.

दरम्यान, अपघातानंतर, अजयच्या मृतदेहासह ७ प्रवाशांचे मृतदेह दीव येथे आणण्यात आले. दुसरीकडे, पोलिस आणि प्रशासनाने आतापर्यंत २०० हून अधिक मृतदेह बाहेर काढले आहेत. मात्र अनेक मृतदेहांची ओळख पटलेली नाही. मृतदेहांची स्थिती खूपच वाईट आहे. त्यामुळे डीएनए चाचणीद्वारे त्यांची ओळख पटवली जात आहे. तर अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २५ जखमींवर उपचार सुरू आहेत, त्यापैकी बहुतेक वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात