शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

VIDEO: डिस्चार्ज मिळताच विश्वासकुमारने भावाच्या मृतदेहाला दिला खांदा; दोघेही जात होते लंडनला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:33 IST

अहमदाबाद विमान अपघातात जखमी झालेले विश्वास कुमार भावाच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

Ahmedabad Air India Plane Crash:अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात कोसळले आणि मोठी जीवितहानी झाली. विमानातील प्रवाशांसह २७० जणांचा या अपघातात भीषण मृत्यू झाला. मात्र या अपघातातून विमानातील केवळ एकच प्रवासी वाचला आहे. अहमदाबादमधीलएअर इंडियाच्या विमान अपघातात विश्वास कुमार रमेश हे एकमेव प्रवासी बचावले. विमानातील उर्वरित २४१ जणांचा मृत्यू झाला. दुर्दैवाने या मृतांमध्ये विश्वास कुमार यांचा भाऊ देखील होता. रुग्णालयातून डिस्चार्च मिळाल्यानंतर विश्वास कुमार यांनी भावाच्या अंत्ययात्रेमध्ये सहभाग घेतला. यावेळी विश्वास कुमार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. एअर इंडियाच्या एआय १७१ बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर या विमानात लंडनला जाणाऱ्या २४२ जणांपैकी फक्त एक प्रवासी वाचला होता ४० वर्षीय ब्रिटिश-भारतीय नागरिक रमेश ११ए क्रमांकाच्या सीटवर बसला होते. विश्वास कुमार या भयानक अपघातातून वाचले तर त्यांचा धाकटा भाऊ अजय कुमार रमेश यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातून उपचार घेऊन परतल्यानंतर विश्वास कुमार भावाच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते.

विश्वास कुमार यांनी सांगितले होते की उड्डाणानंतर ३० सेकंदांनी मोठा आवाज झाला आणि विमान कोसळले. सर्व काही इतक्या लवकर घडले की काहीही समजले नाही. विश्वास कुमार हे ११ ए या आपत्कालीन एक्झिटजवळ बसले होते. विमान कोसळ्यानंतर त्यातून बाहेर पडत विश्वास कुमार यांनी आपला जीव गमावला होता. विश्वास कुमार यांचा भाऊ अजय ११ जे सीटवर बसला होता. तो या अपघातातून वाचू शकला नाही. दोन्ही भाऊ दीव येथून कुटुंबाला भेटून लंडनला परतत होते. विश्वास कुमार यांनी रुग्णालयातून त्यांच्या भावाचा शोध घेतला मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. अजयच्या दीवमधील अंतिम यात्रेदरम्यान विश्वास कुमारने त्याला खांदा दिला. विश्वास कुमार याच्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप कठीण क्षण होता.

दरम्यान, अपघातानंतर, अजयच्या मृतदेहासह ७ प्रवाशांचे मृतदेह दीव येथे आणण्यात आले. दुसरीकडे, पोलिस आणि प्रशासनाने आतापर्यंत २०० हून अधिक मृतदेह बाहेर काढले आहेत. मात्र अनेक मृतदेहांची ओळख पटलेली नाही. मृतदेहांची स्थिती खूपच वाईट आहे. त्यामुळे डीएनए चाचणीद्वारे त्यांची ओळख पटवली जात आहे. तर अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २५ जखमींवर उपचार सुरू आहेत, त्यापैकी बहुतेक वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात