Ahmedabad Air India Plane Crash:अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात कोसळले आणि मोठी जीवितहानी झाली. विमानातील प्रवाशांसह २७० जणांचा या अपघातात भीषण मृत्यू झाला. मात्र या अपघातातून विमानातील केवळ एकच प्रवासी वाचला आहे. अहमदाबादमधीलएअर इंडियाच्या विमान अपघातात विश्वास कुमार रमेश हे एकमेव प्रवासी बचावले. विमानातील उर्वरित २४१ जणांचा मृत्यू झाला. दुर्दैवाने या मृतांमध्ये विश्वास कुमार यांचा भाऊ देखील होता. रुग्णालयातून डिस्चार्च मिळाल्यानंतर विश्वास कुमार यांनी भावाच्या अंत्ययात्रेमध्ये सहभाग घेतला. यावेळी विश्वास कुमार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. एअर इंडियाच्या एआय १७१ बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर या विमानात लंडनला जाणाऱ्या २४२ जणांपैकी फक्त एक प्रवासी वाचला होता ४० वर्षीय ब्रिटिश-भारतीय नागरिक रमेश ११ए क्रमांकाच्या सीटवर बसला होते. विश्वास कुमार या भयानक अपघातातून वाचले तर त्यांचा धाकटा भाऊ अजय कुमार रमेश यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातून उपचार घेऊन परतल्यानंतर विश्वास कुमार भावाच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते.
विश्वास कुमार यांनी सांगितले होते की उड्डाणानंतर ३० सेकंदांनी मोठा आवाज झाला आणि विमान कोसळले. सर्व काही इतक्या लवकर घडले की काहीही समजले नाही. विश्वास कुमार हे ११ ए या आपत्कालीन एक्झिटजवळ बसले होते. विमान कोसळ्यानंतर त्यातून बाहेर पडत विश्वास कुमार यांनी आपला जीव गमावला होता. विश्वास कुमार यांचा भाऊ अजय ११ जे सीटवर बसला होता. तो या अपघातातून वाचू शकला नाही. दोन्ही भाऊ दीव येथून कुटुंबाला भेटून लंडनला परतत होते. विश्वास कुमार यांनी रुग्णालयातून त्यांच्या भावाचा शोध घेतला मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. अजयच्या दीवमधील अंतिम यात्रेदरम्यान विश्वास कुमारने त्याला खांदा दिला. विश्वास कुमार याच्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप कठीण क्षण होता.
दरम्यान, अपघातानंतर, अजयच्या मृतदेहासह ७ प्रवाशांचे मृतदेह दीव येथे आणण्यात आले. दुसरीकडे, पोलिस आणि प्रशासनाने आतापर्यंत २०० हून अधिक मृतदेह बाहेर काढले आहेत. मात्र अनेक मृतदेहांची ओळख पटलेली नाही. मृतदेहांची स्थिती खूपच वाईट आहे. त्यामुळे डीएनए चाचणीद्वारे त्यांची ओळख पटवली जात आहे. तर अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २५ जखमींवर उपचार सुरू आहेत, त्यापैकी बहुतेक वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.