शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

उमेदवारांना पक्षाकडून पुरेसा निधी न मिळाल्याने काँग्रेसचा पराभव : माजी मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 17:16 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहिल्यास, पक्षाला काहीही नुकसान होणार नाही. त्यांना आता अध्यक्षपदाचा चांगला अनुभव आला असल्याचे वीरभद्र यांनी सांगितले.

मुंबई - हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंग यांनी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाचे कारण सांगितले. काँग्रेसच्या उमेदवाराना निवडणुक लढविण्यासाठी पक्षाकडून पुरेसा निधी मिळाला नसल्याचा दावा वीरभद्र सिंग यांनी केला आहे.

पक्षाकडून उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी पुरेसा निधी मिळाला नाही. त्यामुळे निवडणूक प्रचाराला गती येऊ शकली नाही, असं वीरभद्र यांनी म्हटले. तसेच त्यांनी पक्ष नेतृत्वाला टोला लगावताना म्हटले की, लोकसभा निवडणूक लढवत असताना राष्ट्रीय पक्षाकडे पुरेशा प्रमाणात साधनसामग्री आवश्यक असते.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहिल्यास, पक्षाला काहीही नुकसान होणार नाही. त्यांना आता अध्यक्षपदाचा चांगला अनुभव आला असल्याचे वीरभद्र यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नैतिकता दाखवत राहुल यांनी राजीनामा देऊ केला होता. मात्र पक्षाकडून एकमुखाने त्यांचा राजीनामा फेटाळण्यात आला आहे.

यावेळी वीरभद्र सिंह यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यावर देखील टीका केली. भारतीय जनता पक्षाच्या विजयामागे ठाकूर यांचे काहीही योगदान नाही. भाजपला राज्यात जो विजय मिळाला त्याची कारणं वेगळी असल्याचे त्यांनी म्हटले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसHimachal Pradeshहिमाचल प्रदेशBJPभाजपा