शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

"प्रजासत्ताकदिनी केंद्राच्या मदतीनेच हिंसाचार; शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे कारस्थान"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 06:40 IST

काँग्रेसचा आरोप; दीप सिद्धू व त्याच्या अनुयायांना अटक करण्याऐवजी त्यांना हिंसाचाराच्या घटनेनंतर लाल किल्ल्यातून जाऊ देण्यात आले.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनात प्रजासत्ताकदिनी हिंसाचार घडविण्याचे कारस्थान केंद्र सरकारच्या मदतीने आखण्यात आले व पार पडले. या हिंसाचाराद्वारे शेतकरी आंदोलनाची प्रतिमा मलीन करण्याचा केंद्र सरकारचा हेतू होता, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्यात यावे. जिथे हिंसाचार झाला त्याठिकाणी प्रचंड सुरक्षा व्यवस्था होती. याचा अर्थ ही सुरक्षा व्यवस्था व गुप्तचर यंत्रणा हिंसक प्रकार रोखण्यास पूर्णपणे अयशस्वी ठरली. 

सुरजेवाला यांनी सांगितले की, लाल किल्ल्यामध्ये दीप सिद्धू व त्याच्या अनुयायांनी धुडगूस घातला. तिथे ध्वजस्तंभावर झेंडा फडकवला. या दीप सिद्धूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेतचे छायाचित्र समाजमाध्यमांवर झळकले आहे. दीप सिद्ध हा कोणाचा माणूस, याचे अनेक पुरावे समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. दीप सिद्धू व त्याच्या अनुयायांना अटक करण्याऐवजी त्यांना हिंसाचाराच्या घटनेनंतर लाल किल्ल्यातून जाऊ देण्यात आले.

‘हिंसाचार घडविणाऱ्यांचे केंद्राशी लागेबांधे’ शेतकरी आंदोलकांची माथी भडकविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्यांच्या हस्तकांनी दिल्लीत हिंसाचार घडवून आणला. अशा लोकांचे सत्ताधारी पक्षाशी संबंध आहेत, असा आरोप माकपने भाजपचे नाव न घेता केला आहे. हिंसाचार झाला असला तरी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही, असे माकपने म्हटले आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार