शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

"प्रजासत्ताकदिनी केंद्राच्या मदतीनेच हिंसाचार; शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे कारस्थान"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 06:40 IST

काँग्रेसचा आरोप; दीप सिद्धू व त्याच्या अनुयायांना अटक करण्याऐवजी त्यांना हिंसाचाराच्या घटनेनंतर लाल किल्ल्यातून जाऊ देण्यात आले.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनात प्रजासत्ताकदिनी हिंसाचार घडविण्याचे कारस्थान केंद्र सरकारच्या मदतीने आखण्यात आले व पार पडले. या हिंसाचाराद्वारे शेतकरी आंदोलनाची प्रतिमा मलीन करण्याचा केंद्र सरकारचा हेतू होता, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्यात यावे. जिथे हिंसाचार झाला त्याठिकाणी प्रचंड सुरक्षा व्यवस्था होती. याचा अर्थ ही सुरक्षा व्यवस्था व गुप्तचर यंत्रणा हिंसक प्रकार रोखण्यास पूर्णपणे अयशस्वी ठरली. 

सुरजेवाला यांनी सांगितले की, लाल किल्ल्यामध्ये दीप सिद्धू व त्याच्या अनुयायांनी धुडगूस घातला. तिथे ध्वजस्तंभावर झेंडा फडकवला. या दीप सिद्धूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेतचे छायाचित्र समाजमाध्यमांवर झळकले आहे. दीप सिद्ध हा कोणाचा माणूस, याचे अनेक पुरावे समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. दीप सिद्धू व त्याच्या अनुयायांना अटक करण्याऐवजी त्यांना हिंसाचाराच्या घटनेनंतर लाल किल्ल्यातून जाऊ देण्यात आले.

‘हिंसाचार घडविणाऱ्यांचे केंद्राशी लागेबांधे’ शेतकरी आंदोलकांची माथी भडकविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्यांच्या हस्तकांनी दिल्लीत हिंसाचार घडवून आणला. अशा लोकांचे सत्ताधारी पक्षाशी संबंध आहेत, असा आरोप माकपने भाजपचे नाव न घेता केला आहे. हिंसाचार झाला असला तरी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही, असे माकपने म्हटले आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार