शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, ४ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 23:02 IST

मणिपूर पोलिसांकडून या हल्ल्यात ४ जण मृत्युमुखी पडल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे

मणिपूर - गेल्या वर्षभरापासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये अद्याप शांतता प्रस्थापित होऊ शकलेली नाही. मणिपूरमधील मोरेह येथे पोलीस आणि उग्रवाद्यांमध्ये चकमक झाली होती. उग्रवाद्यांनी सुरक्षा दलांवर दबा धरून हल्ला केला. रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडद्वारे करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये चार पोलीस कमांडो जखमी झाले होते. त्यानंतर, थौबल आणि इम्फाळ वेस्ट जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी थौबल जिल्ह्यातील लिलोंग परिसरात अज्ञात शस्त्रधारी गुंड आणि स्थानिकांमध्ये झटापट झाली. या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.  

मणिपूर पोलिसांकडून या हल्ल्यात ४ जण मृत्युमुखी पडल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. शस्त्रधारी गुंडांनी स्थानिकांवर हल्ला केला, यावेळी गोळीबारही करण्यात आला. त्यामध्ये, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, इम्फाळ पूर्व जिल्ह्यातही संचारबंदी लावण्यात आली आहे. आता, मणिपूरच्या इम्फाळ घाटीत पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर विष्णुपूर जिल्ह्यातील संचारबंदीत देण्यात आलेली सवलत बंद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एन. बीरेन यांनी एका व्हिडिओ संदेशातून नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. संबंधित घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, तसेच सरकारला सहकार्य करावे, असे बीरेन यांनी म्हटले आहे. लिलोंगच्या नागरिकांनी हिंसात्मक पाऊल उचलू नये, पोलीस आरोपींचा शोध घेत असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,  असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

दोन दिवसांपूर्वीच झाली झटापट

मणिपूरमध्ये ३० डिसेंबर रोजीही उग्रवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य केले होते. त्यामध्ये, एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायांना दुखापत झाली होती. रात्री सुमारे ११.४० च्या सुमारास संदिग्ध कुकी उग्रवाद्यांनी सुरक्षा दलांवर आरपीजीद्वारे हल्ला केला. त्यानंतर उग्रवाद्यांनी मेरेह येथे तैनात असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरदाखल कारवाईमध्ये पोलिसांनीही गोळीबार केला. दोन्हीकडून रात्रभर गोळीबार सुरू होती, असे सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारChief Ministerमुख्यमंत्रीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस