शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याला लावली आग, प्रशासनानं आरोपींच्या घरावरून फिरवलं बुलडोझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 16:02 IST

एका व्यक्तीचा पोलीस ठाण्यातच मृत्यू झाला, असा आरोप या गावकऱ्यांनी केला होता.

आसामच्या नागाव येथील काही संतप्त गावकऱ्यांनी एका पोलीस ठाण्यालाच आग लावली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षा घेत, दुसऱ्या दिवशी प्रशासनाने कठोर कारवाई करत येथील अनेक घरांवरून बुलडोझर फिरवला. सलोनाबोरी गावातील जवळपास 40 जणांनी बाताद्रवा पोलीस ठाण्याला आग लावली होती. एका व्यक्तीचा पोलीस ठाण्यातच मृत्यू झाला, असा आरोप या गावकऱ्यांनी केला होता.

यासंदर्भात, नागाव जिल्हा प्रशासनाने मृताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना निलंबितही करण्यात आले आहे. याच बरोबर, रविवारी सकाळच्या सुमारास, पोलीस ठाण्याला आग लावण्याच्या घटनेत सहभागी असलेल्यांच्या घरावरून बुलडोझर फिरविण्यात आला आहे.

यासंदर्भात आसामचे स्पेशल डीजीपी जीपी सिंह म्हणाले, जमावात एकूण ४० लोक होते. यांपैकी सात जणांची ओळख पटली आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, इतर 21 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याच बरोबर, कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणातही पोलिसांविरोधात कठोर करवाई करण्यात येईल. मात्र, अशा आरोपांनंतर, आपण पोलीस ठाण्यालाच आग लावावी, हे बिलकूल योग्य नाही. आरोपींची ओळख पटविण्यासाटी व्हिडिओ फुटेज पाहण्यात येत आहे, असेही जीपी सिंह यांनी म्हटले आहे.

घरांवर बुलडोझर चालविल्याच्या घटनेनंतर, बारपेटाचे काँग्रेस खासदार अब्दुल खलीक यांनी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला आहे. "मी पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याचे कधीही समर्थ नकरत नही. पण, पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांची घरे तोडणे, हे मानवाधिकाराचे उल्लंघन आहे," असे खलीक यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :AssamआसामPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी