शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याला लावली आग, प्रशासनानं आरोपींच्या घरावरून फिरवलं बुलडोझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 16:02 IST

एका व्यक्तीचा पोलीस ठाण्यातच मृत्यू झाला, असा आरोप या गावकऱ्यांनी केला होता.

आसामच्या नागाव येथील काही संतप्त गावकऱ्यांनी एका पोलीस ठाण्यालाच आग लावली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षा घेत, दुसऱ्या दिवशी प्रशासनाने कठोर कारवाई करत येथील अनेक घरांवरून बुलडोझर फिरवला. सलोनाबोरी गावातील जवळपास 40 जणांनी बाताद्रवा पोलीस ठाण्याला आग लावली होती. एका व्यक्तीचा पोलीस ठाण्यातच मृत्यू झाला, असा आरोप या गावकऱ्यांनी केला होता.

यासंदर्भात, नागाव जिल्हा प्रशासनाने मृताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना निलंबितही करण्यात आले आहे. याच बरोबर, रविवारी सकाळच्या सुमारास, पोलीस ठाण्याला आग लावण्याच्या घटनेत सहभागी असलेल्यांच्या घरावरून बुलडोझर फिरविण्यात आला आहे.

यासंदर्भात आसामचे स्पेशल डीजीपी जीपी सिंह म्हणाले, जमावात एकूण ४० लोक होते. यांपैकी सात जणांची ओळख पटली आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, इतर 21 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याच बरोबर, कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणातही पोलिसांविरोधात कठोर करवाई करण्यात येईल. मात्र, अशा आरोपांनंतर, आपण पोलीस ठाण्यालाच आग लावावी, हे बिलकूल योग्य नाही. आरोपींची ओळख पटविण्यासाटी व्हिडिओ फुटेज पाहण्यात येत आहे, असेही जीपी सिंह यांनी म्हटले आहे.

घरांवर बुलडोझर चालविल्याच्या घटनेनंतर, बारपेटाचे काँग्रेस खासदार अब्दुल खलीक यांनी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला आहे. "मी पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याचे कधीही समर्थ नकरत नही. पण, पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांची घरे तोडणे, हे मानवाधिकाराचे उल्लंघन आहे," असे खलीक यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :AssamआसामPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी