शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

म्हणून या गावाने नाही साजरा केला स्वातंत्र्य दिन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 12:52 PM

देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना एका गावाने स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना उत्तर प्रदेशमध्ये एका गावाने स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. लखीमपुर खीरी जिल्ह्यातील चौधीपूर गावातील लोकांनी स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

लखीमपुर खीरी, दि. 15 - देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना उत्तर प्रदेशमध्ये एका गावाने स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. लखीमपुर खीरी जिल्ह्यातील चौधीपूर गावातील लोकांनी स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. लखीमपुर खीरी जिल्ह्यापासून जवळपास 70 किलोमीटर दूर असलेल्या चौधीपूर गावात अजूनपर्यंत विकास झालेला नाही. गावात विज नाहीये तर रस्त्यांची स्थिती देखील अत्यंत वाईट आहे. अर्ध्याहून अधिक घरांमध्ये शौचालय नसल्याने गावक-यांना अजूनही उघड्यावर शौचास जावं लागतं. येथे राहणारा बहुतांश समाज हा आदिवासी आहे. त्यामुळे उपजिवेकेसाठी येथील लोक जंगलावर किंवा रोजंदारीच्या कामावर अवलंबून राहावं लागतं. येथे जवळपास 80 कुटुंब राहतात पण केवळ चार शौचालयं आहेत. आजूबाजूच्या गावांमध्ये विजेची सोय आहे, पण चौधीपूर गावात अजूनपर्यंत इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नाही, नवभारत टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. स्वातंत्र्य होवून 70 वर्ष झाली पण आमच्या आयुष्यात काहीही फरक पडलेला नाही. आम्ही अजूनही त्याच गरिबीत जगत आहोत. अशा स्वातंत्र्याचा काय फायदा?आम्हाला जर मुलभूत सुविधाच मिळत नाहीत तर आम्ही स्वातंत्र्य दिन का साजरा करावा. आमच्याकडे मुलभूत सुविधा नसल्यामुळे आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करणार नाही असं गावातील एक रहिवासी  गुलाब सिंह म्हणाले. जर कोणा अधिका-याने आम्हाला विचारलं की तुम्ही स्वातंत्र्य दिन साजरा का करत नाही तर मी त्यांना आमच्या गावात बोलवेन आणि आम्ही कोणत्या परिस्थितीत जगतोय हे त्यांना दाखवेन, असं गावातील आणखी एक रहिवासी राम स्वरूप म्हणाले.  

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवस