शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

विजय मल्ल्यांना देशाबाहेर काढू शकत नाही -ब्रिटीश सरकारने फेटाळली मागणी

By admin | Published: May 11, 2016 9:42 AM

भारत सरकारने विजय माल्या यांचा पासपोर्ट जरी रद्द केला असला तरी आम्ही त्यांना देशाबाहेर काढू शकत नाही, असे ब्रिटन सरकारने स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बूडवून देशाबाहेर पळालेले विजय मल्ल्या हे इतक्यात तरी भारतात परतण्याची चिन्हे दिसत नाहीत. सरकारने जरी त्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द केला असला तरीही मल्या यांना भारतात परत पाठवू शकत नाही, असे सांगत ब्रिटीश सरकारने केंद्र सरकारची मागणी फेटाळली. मल्ल्या यांचे हस्तांतरण शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र असे असले तरीही मल्ल्या यांच्यावर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांची ब्रिटन सरकारला पूर्ण कल्पना असून त्यांनी भारत सरकारला मदत करण्यास पूर्णपणे तयारी दाखवली आहे. 
 
तीनवेळा समन्स बजावूनही विजय मल्ल्या हजर न झाल्यामुळे सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला त्यांचा पासपोर्ट रद्द किंवा हस्तगत करावा, असे कळविले होते, त्यानुसार गेल्या महिन्यात मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला होता. पासपोर्ट रद्द झाल्यामुळे परदेशातील त्यांचे वास्तव्य बेकायदा ठरून त्यांना मायदेशी परतणे भाग पडेल, असा अधिका-यांचा होरा होता. मात्र ब्रिटन सरकारने त्यांना देशाबाहेर घालवण्यास नकार दर्शवला असून याप्रकरणी भारत सरकारने कायदेशीर मदत घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिल्याचे परराषष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी नमूद केले. 
 
' १९७१ सालच्या इमिग्रेशन कायद्यानुसार ब्रिटनमध्ये प्रवेश करताना एखाद्या इसमाचा पासपोर्ट वैध असल्यास त्यानंतर देशात राहण्यासाठी त्या व्यक्तीचा पासपोर्ट वैध असणे आवश्यक नाही,' असे स्वरूप म्हणाले.  विजय मल्ल्या यांनी २ मार्च रोजी भारतातून ब्रिटनमध्ये पलायन केले व त्यानंतरच काही कालावधीने भारत सरकारने त्यांचा पासपोर्ट रद्द केला होता. म्हणजेच ब्रिटनमध्ये प्रवेश करताना मल्ल्या यांचा पासपोर्ट वैध असल्याने आता ब्रिटन सरकार त्यांना देशाबाहेर काढू शकत नाही व त्यामुळेच ते ब्रिटनमध्ये कायदेशीररित्या राहू शकतात' असे दिसते. ईडीने मल्ल्यांना बजावलेल्या तिसऱ्या समन्समध्ये नऊ एप्रिलला चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले होते. मात्र, मल्ल्या हजर झाले नाहीत. ईडी ९०० कोटी रूपयांच्या आयडीबीआय कर्ज घोटाळ्याचा तपास करीत आहे.