शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

Video: शिवसेना स्वार्थी... शेतकरी प्रश्नावरुन नवनीत राणा लोकसभेत आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 15:28 IST

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्यास फक्त शिवसेनाच जबाबदार आहे.

नवी दिल्ली - अमरावती मतदारसंघातील खासदार नवनीत राणा कौर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लोकसभेतील आपल्या भाषणावेळी नवनीत कौर यांनी शिवसेनवर जहरी टीका केली. शिवसेनेच्या खासदारांनी शेतकऱ्यांसाठी संसदेबाहेर घोषणाबाजी केली. पण, आपल्या स्वार्थासाठी, आपल्या लालचेसाठी, आपल्या पोस्टसाठी शिवसेना महाराष्ट्रात सरकार स्थापन करत नाही. जनतेनं मताधिक्य दिल्यानंतरही शिवसेना युतीतून बाहेर का पडली, असे म्हणत राणा यांनी शिवसेनेवर जबरी प्रहार केला. 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्यास फक्त शिवसेनाच जबाबदार आहे. स्वत:चा स्वार्थ आणि स्वत:च घर भरण्याऐवजी शेतकऱ्यांसाठी शिवसेनेनं सत्ता स्थापन करायला हवी होती. आज महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला असून शेतकऱ्यांना मदत करायची भावना असल्यास मी स्वत:च घरही जाळायला तयार आहे. पण, शिवसेना सत्ता स्थापनेपासून दूर केली. मी जिल्ह्यातील तालुक्यात फिरुन, फिरुन पाहिलंय. शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन, मुग आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय. पण, आज आमच्या राज्याला माय-बाप कुणीच नाही. त्यामुळे, केंद्र सरकारच आमचं मायबाप असून केंद्राने आम्हाला 50 हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी पुरस्कृत खासदार नवनीत राणा कौर यांनी केली आहे.

पाहा व्हिडीओ - 

नवनीत कौर यांनी शिवसेनेवर टीका केल्यानंतर सभागृहात त्यांना विरोध करण्यात आला होता. मात्र, मी आज थांबणार नाही, आज कुणीही माझा आवाज बंद करू शकणार नाही. मी माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं गाऱ्हाण सांगणारचं, असे म्हणत कौर यांनी लोकसभेत आक्रमकपणे भूमिका मांडली.  

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाFarmerशेतकरीdroughtदुष्काळ