शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

Video : भारताला ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळालंय; भाजप प्रवक्त्याचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 11:54 IST

Ruchi Pathak Controversial Statements: भारताला ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळालं असल्याचा दावा भाजप प्रवक्त्या रूची पाठक यांनी झांसीमधील एका कार्यक्रमादरम्यान केला.

ठळक मुद्दे भारताला ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळालं असल्याचा दावा भाजप प्रवक्त्या रूची पाठक यांनी झांसीमधील एका कार्यक्रमादरम्यान केला.

भाजपच्या एका महिला प्रवक्त्यानं (Spokeperson) भारताच्या स्वातंत्र्याबद्दल मोठा दावा केला आहे. एका मीडिया डिबेटदरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून सर्वांनाच धक्का बसला."भारताला स्वातंत्र्य आता मिळालंच नाही. भारताला स्वातंत्र्य ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर मिळालं आहे. देश हा पूर्णपणे स्वतंत्र नाही. याबाबत लेखी करार करण्यात आला होता," असं अजब वक्तव्य झांसीमधील भाजप प्रवक्त्या रूची पाठक (BJP Spokeperson Ruchi Pathak) यांनी केलं. यानंतर अनेक ठिकाणाहून त्यांच्यावर टीका करण्यात आली. 

सोशल मीडियावरुन अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. अनेकांनी त्यांना व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचं टॉपर असं संबोधलं. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र त्यांनी माघार घेतल्याचं दिसून आलं. आपल्याला जी माहिती मिळाली ती सोशल मीडियाद्वारे (Social Media) मिळाल्याचं त्या म्हणाल्या. तसंच यावेळी त्यांनी राजीव दीक्षित यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला. झांसीमध्ये लल्लनटॉपनं एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमादरम्यान भाजपच्या स्थानिक प्रवक्त्या रुची पाठकही उपस्थित होत्या. यावेळी खासगीकरणावरून काँग्रेसचे प्रवक्ते गौरव जैन यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी एअर इंडियाच्या विक्रीचाही उल्लेख केला. यावेळी भाजपनं आपली बाजू मांडली. "भारताचं स्वातंत्र्य हे काँन्ट्रॅक्ट बेस आहे. काँग्रेसने ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य घेतचलं आहे. भारत पूर्णपणे स्वतंत्र नाही. ब्रिटीश कायद्याची शपथ घेण्यात आली होती. निवडणुका नंतर घेण्यात आल्या आणि १९५१ मध्ये भारताचं संविधान लागू करण्यात आलं," असंही त्या यावेळी म्हणाल्या. भारताचं स्वातंत्र्य हे ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेण्यात आल्याचं स्पष्ट होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

त्यांच्या या वक्तव्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. तसंच काही नेटकऱ्यांनी त्या व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीच्या टॉपस असल्याचं म्हटलं. यानंतर रूची पाठक यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं.

टॅग्स :BJPभाजपाIndiaभारत