शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

Video : भारताला ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळालंय; भाजप प्रवक्त्याचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 11:54 IST

Ruchi Pathak Controversial Statements: भारताला ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळालं असल्याचा दावा भाजप प्रवक्त्या रूची पाठक यांनी झांसीमधील एका कार्यक्रमादरम्यान केला.

ठळक मुद्दे भारताला ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळालं असल्याचा दावा भाजप प्रवक्त्या रूची पाठक यांनी झांसीमधील एका कार्यक्रमादरम्यान केला.

भाजपच्या एका महिला प्रवक्त्यानं (Spokeperson) भारताच्या स्वातंत्र्याबद्दल मोठा दावा केला आहे. एका मीडिया डिबेटदरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून सर्वांनाच धक्का बसला."भारताला स्वातंत्र्य आता मिळालंच नाही. भारताला स्वातंत्र्य ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर मिळालं आहे. देश हा पूर्णपणे स्वतंत्र नाही. याबाबत लेखी करार करण्यात आला होता," असं अजब वक्तव्य झांसीमधील भाजप प्रवक्त्या रूची पाठक (BJP Spokeperson Ruchi Pathak) यांनी केलं. यानंतर अनेक ठिकाणाहून त्यांच्यावर टीका करण्यात आली. 

सोशल मीडियावरुन अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. अनेकांनी त्यांना व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचं टॉपर असं संबोधलं. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र त्यांनी माघार घेतल्याचं दिसून आलं. आपल्याला जी माहिती मिळाली ती सोशल मीडियाद्वारे (Social Media) मिळाल्याचं त्या म्हणाल्या. तसंच यावेळी त्यांनी राजीव दीक्षित यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला. झांसीमध्ये लल्लनटॉपनं एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमादरम्यान भाजपच्या स्थानिक प्रवक्त्या रुची पाठकही उपस्थित होत्या. यावेळी खासगीकरणावरून काँग्रेसचे प्रवक्ते गौरव जैन यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी एअर इंडियाच्या विक्रीचाही उल्लेख केला. यावेळी भाजपनं आपली बाजू मांडली. "भारताचं स्वातंत्र्य हे काँन्ट्रॅक्ट बेस आहे. काँग्रेसने ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य घेतचलं आहे. भारत पूर्णपणे स्वतंत्र नाही. ब्रिटीश कायद्याची शपथ घेण्यात आली होती. निवडणुका नंतर घेण्यात आल्या आणि १९५१ मध्ये भारताचं संविधान लागू करण्यात आलं," असंही त्या यावेळी म्हणाल्या. भारताचं स्वातंत्र्य हे ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेण्यात आल्याचं स्पष्ट होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

त्यांच्या या वक्तव्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. तसंच काही नेटकऱ्यांनी त्या व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीच्या टॉपस असल्याचं म्हटलं. यानंतर रूची पाठक यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं.

टॅग्स :BJPभाजपाIndiaभारत