शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

Video : महात्मा गांधींचे मारेकरी आज सत्तेत, त्यांना तुरुंगात डांबणार का? - स्वरा भास्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2018 9:29 AM

वादग्रस्त विधान करुन चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - वादग्रस्त विधान करुन चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ''राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारे आज सत्तेत आहेत. त्यांना आपण तुरुंगात डांबणार का?'', असे वादग्रस्त विधान स्वरा भास्करनं केले आहे. दरम्यान, हा गंभीर आरोप करताना स्वरानं कोणाच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख केला नाही. स्वराच्या या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्वरा भास्करनं हे वक्तव्य केले आहे. देशभरात सुरू असलेल्या कथित नक्षलवादी 'थिंक टँक' अटकसत्रासंदर्भात स्वराचे विधान जोडण्यात येत आहे.  

दिल्लीमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधताना स्वरानं अप्रत्यक्षरित्या भाजपा सरकारवर निशाणा साधत म्हटले की, ''आपल्या देशात जेव्हा महात्मा गांधी यांच्यासारख्या महान नेत्याची हत्या करण्यात आली, तेव्हा काही लोक आनंद उत्सव साजरा करत होते. आज तिच लोक सत्तेत आहेत. त्यांना आपण तुरुंगात डांबणार आहोत का?. तर याचे उत्तर नाही असंच आहे. दुसरीकडे सध्या काहीही झालं की तुरुंगात टाका असे म्हटले जाते.'' 

(हे घ्या ई-मेल, पत्रं... देशाविरोधात कट रचला जात होता; माओवादी 'थिंक टँक' अटकेप्रकरणी पोलिसांनी दाखवले पुरावे)

रक्तासाठी तहानलेला समाज बनणे ही चांगली गोष्ट नाही, अशी टीकादेखील तिनं यावेळी केली.भिंद्रनवाले यांनाही काही लोक संत म्हणत त्या सगळ्यांनाही उचलून तुरुंगात टाकणार का? असाही प्रश्न स्वरा भास्करने उपस्थित केला आहे. 

दरम्यान, मंगळवारी (28 ऑगस्ट) कथित नक्षलवादी 'थिंक टँक' असल्याच्या संशयातून कवी वारा वारा राव, अरुण परेरा, गौतम नवलखा, वेरनोन गोन्झाल्विस आणि सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली होती. या सर्वांना 6 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. स्वरा भास्करनं यापूर्वीही सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर आपलं मत व्यक्त केले आहे. यामुळे अनेकदा तिच्यावर सडकून टीकादेखील झाली आहे.  

 

टॅग्स :Swara Bhaskarस्वरा भास्करNarendra Modiनरेंद्र मोदीMahatma Gandhiमहात्मा गांधीnaxaliteनक्षलवादी