शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Video - "रावणाने सीतेचे अपहरण करुन मोठा गुन्हा केला नाही"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 12:09 IST

BJP Gulabchand Katarias : रणधीर सिंह भींडर (Randhir Singh Bhindar) यांनी एक व्हिडीओ शेअर करत भाजपा नेते गुलाबचंद कटारिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - राजस्थान विधानसभेचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया (Gulabchand Kataria) हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. आता त्यांनी बोहेडा येथील एका कार्यक्रमात आणखी एक मोठं वादग्रस्त विधान केलं आहे. "रावणाने सीतेचे अपहरण करुन कोणता मोठा गुन्हा केला नाही. कारण रावणाने सीतेला स्पर्श केला नव्हता" असं  म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला असून राजस्थानमध्येराजकारण तापलं आहे. 

उदयपूर जिल्ह्यातील वल्लभनगर विधानसभेचे माजी आमदार रणधीर सिंह भींडर (Randhir Singh Bhindar) यांनी एक व्हिडीओ शेअर करत भाजपा नेते गुलाबचंद कटारिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कटारियाच्या मते रावण खूप सिद्धांतिक व्यक्ती होता. त्याने काही मोठा गुन्हा केला नाही असं म्हटलं आहे. तसेच भाजपा नेत्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "सीतेचे अपहरण एक सामान्य विषय होता. जर रावणाने सीतेला स्पर्श केला असता तर तो गुन्हा झाला असता" असं कटारिया यांनी म्हटलं होतं. 

कटारियांच्या मते जर कुणाच्या पत्नीचे अपहरण करुन स्पर्श केला नाही तर तो गुन्हा नाही, या शब्दात रणधीर सिंह यांनी कटारिया यांच्यावर खोचक टीका केली आहे. तसेच जर रावणाने कोणताच गुन्हा केला नाही तर कटारिया संपूर्ण रामायण खोटे आहे, असे सिद्ध करत आहेत, जेव्हा की भगवान राम यांचा जन्म रावण या राक्षसाचा वध करण्यासाठीच झाला होता असंही म्हटलं आहे.

रणधीर सिंह भीडर यांनी कटारिया यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत म्हटलं की, "कटारिया हे रावणाचेच अनुयायी आहेत. यामुळेच भगवान राम, महाराणा प्रताप आणि आपल्या इतिहास याबाबत बोलत राहतात. व्यक्तीचे बोलणेच त्याचे चरित्र कसे आहे, हे दाखवते. आता आम्हाला समजायला लागले आहे की, ते हिंदू आणि मेवाडी नाही तर श्रीलंकेतून आले आहेत. त्यांना त्यांचा आदर्श पुरुष रावणाला भेटण्यासाठी तिथेच पाठवून द्यायला हवे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाRajasthanराजस्थानPoliticsराजकारण