शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोघे २० फूट हवेत उडाले तर दोघांना फरफटत नेलं; कारच्या धडकेत बालपणीच्या मित्रांचा भयानक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:30 IST

उत्तर प्रदेशात घडलेल्या एका भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gorakhpur Accident: उत्तर प्रदेशातून अपघाताची अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे एक भरधाव कार आणि बाईकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत चार तरुणांचा मृत्यू झाला. विरुद्ध दिशेने आलेल्या एसयूव्ही कारने तरुणांच्या बाईकला जबर दिली आणि हा अपघात घडला. ही संपूर्ण घटना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन तरुण काही फूट हवेत उडाले तर दोघे फरफटत गेले.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एसयूव्ही कार आणि बाईकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात बाईकवरील चार तरुणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा भीषण अपघात कैद झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कार चालकाचा शोध सुरू केला आहे. गोरखपूर-वाराणसी राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. बाईकस्वार पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. अपघात इतका भीषण होता की धडकेमुळे दोन तरुण हवेत २० फूट उडाले तर दोन तरुण कारच्या बोनेटमध्ये अडकले. कार चालकाने त्यांना सुमारे १०० मीटर फरफटत नेले. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजता घडल्याचे सांगण्यात आलं.

या अपघात प्रदमुन कुमार, राहुल कुमार, सुनील कुमार आणि अरविंद कुमार या चारही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे चौघेही रंगकाम करत होते आणि गावातून गोरखपूर शहरात जात होते. राहुल कुमारचे नुकतेच लग्न झाले होते. घटनेनंतर गावकरी घटनास्थळी जमा झाले आणि पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गुन्हा दाखल केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

गावकऱ्यांनी सांगितले की, अरविंद एका आठवड्यापूर्वी बंगळुरूहून घरी आला होता. तो तिथे रंगकाम करायचा. ते चौघेही बालपणीचे मित्र होते. अरविंद आल्यानंतर ते चौघेही सकाळपासून एकत्र बाहेर फिरायला निघाले होते. शनिवारीही जेव्हा ते चौघेही एकाच बाईकवरून बाहेर पडले तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. अनेकांनी त्यांना थांबवले पण त्यांनी कुणाचेही ऐकले नाही आणि गावाबाहेर पडले. त्यानंतर काही तासांतच त्यांच्या मृत्यूची बातमी आली.

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, या चौघांचाही मृत्यू निष्काळजीपणामुळे झाला आहे. हे चारही तरुण कुटुंबासाठी पैसे कमवत होते आणि ते त्यांच्या कुटुंबियांना देत होते. त्यांच्या कमाईवरच कुटुंबाचा खर्च चालत होता. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अपघातानंतर कारचा चालक गाडी तिथेच सोडून घटनास्थळावरुन पसार झाला. गाडीत सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे आणि सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु करण्यात आला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघातcctvसीसीटीव्हीGorakhpurगोरखपूर