शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 10:40 IST

या तिन्ही पक्षांकडे एकूण १४ खासदार आहेत. त्यामुळे याचा परिणाम कोणावर होणार, कुणाचा नंबर गेम बिघडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली - उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आज सकाळी १० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान पार पडेल. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएकडून सी.पी राधाकृष्णन आणि विरोधी इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होणार आहे. त्यात मतदानाआधीच बीजेडी, बीआरएस आणि अकाली दलाने मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे ही लढत आणखी रंगतदार बनली आहे.

संसदेच्या लोकसभा, राज्यसभा या दोन्ही सभागृहातील सदस्य या निवडणुकीत मतदान करणार आहेत. संख्याबळाचा विचार केल्यास सध्या एनडीएचे उमेदवार सी.पी राधाकृष्णन यांचे पारडे जड आहे. परंतु इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांना पुढे करून विरोधकांनी डाव टाकला. रेड्डी हे मूळचे आंध्र प्रदेशचे असल्याने प्रादेशिक अस्मितेवरून चंद्राबाबू नायडू आणि जगनमोहन रेड्डी यांची कोंडी करण्याचं काम विरोधकांनी केले. त्यात आता मतदानापूर्वी विरोधी पक्षातील ३ पक्षांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही पक्षांकडे एकूण १४ खासदार आहेत. त्यामुळे याचा परिणाम कोणावर होणार, कुणाचा नंबर गेम बिघडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बीजेडी, बीआरएस आणि अकाली दल तटस्थ

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बीजेडी पार्टी, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएसनंतर आता पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाने मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही पक्षांनी ना सी.पी राधाकृष्णन, ना इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा किंवा विरोध केला नाही. त्यामुळे विजय-पराभवातील आकडे बदलले आहेत. बीआरएसकडे राज्यसभेत ४, बीजू जनता दलाकडे ७ आणि शिरोमणी अकाली दलाकडे १ लोकसभा, २ राज्यसभा सदस्य आहेत. तिन्ही पक्षांचे खासदार मतदानात सहभागी होणार नाहीत. 

काय होणार परिणाम?

बीजेडी, बीआरएस आणि अकाली दल खासदारांची संख्या एकूण १४ आहे. सध्या लोकसभेत ५४२ आणि राज्यसभेत २३९ खासदार आहेत. एकूण ७८१ खासदारांना मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे कमीत कमी ३९१ खासदारांचा पाठिंबा असेल तो उमेदवार निवडणुकीत विजयी होईल. आता या तिन्ही पक्षांनी मतदानात भाग न घेतल्याने दोन्ही सभागृहातील खासदारांची संख्या ७६७ इतकी होईल. त्यामुळे विजयासाठी ३८४ खासदारांची गरज आहे. हे तिन्ही पक्ष विरोधी आहेत परंतु मागील ११ वर्षापासून ते सरकारशी जवळीक साधत आलेत. अकाली दल एनडीएचा भाग होती. परंतु बीजेडी, बीआरएस आघाडीत नसतानाही सरकारला पाठिंबा देत होती. सध्या एनडीएच्या बाजूने ४३६ खासदारांचा पाठिंबा दिसून येतो, तर सुदर्शन रेड्डी यांच्यासोबत ३२४ खासदार आहेत. या दोघांमध्ये ११२ मतांचा फरक दिसून येत आहे. मात्र निकालानंतर खरे चित्र लोकांसमोर येणार आहे. 

टॅग्स :ParliamentसंसदNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा