शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 10:40 IST

या तिन्ही पक्षांकडे एकूण १४ खासदार आहेत. त्यामुळे याचा परिणाम कोणावर होणार, कुणाचा नंबर गेम बिघडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली - उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आज सकाळी १० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान पार पडेल. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएकडून सी.पी राधाकृष्णन आणि विरोधी इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होणार आहे. त्यात मतदानाआधीच बीजेडी, बीआरएस आणि अकाली दलाने मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे ही लढत आणखी रंगतदार बनली आहे.

संसदेच्या लोकसभा, राज्यसभा या दोन्ही सभागृहातील सदस्य या निवडणुकीत मतदान करणार आहेत. संख्याबळाचा विचार केल्यास सध्या एनडीएचे उमेदवार सी.पी राधाकृष्णन यांचे पारडे जड आहे. परंतु इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांना पुढे करून विरोधकांनी डाव टाकला. रेड्डी हे मूळचे आंध्र प्रदेशचे असल्याने प्रादेशिक अस्मितेवरून चंद्राबाबू नायडू आणि जगनमोहन रेड्डी यांची कोंडी करण्याचं काम विरोधकांनी केले. त्यात आता मतदानापूर्वी विरोधी पक्षातील ३ पक्षांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही पक्षांकडे एकूण १४ खासदार आहेत. त्यामुळे याचा परिणाम कोणावर होणार, कुणाचा नंबर गेम बिघडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बीजेडी, बीआरएस आणि अकाली दल तटस्थ

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बीजेडी पार्टी, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएसनंतर आता पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाने मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही पक्षांनी ना सी.पी राधाकृष्णन, ना इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा किंवा विरोध केला नाही. त्यामुळे विजय-पराभवातील आकडे बदलले आहेत. बीआरएसकडे राज्यसभेत ४, बीजू जनता दलाकडे ७ आणि शिरोमणी अकाली दलाकडे १ लोकसभा, २ राज्यसभा सदस्य आहेत. तिन्ही पक्षांचे खासदार मतदानात सहभागी होणार नाहीत. 

काय होणार परिणाम?

बीजेडी, बीआरएस आणि अकाली दल खासदारांची संख्या एकूण १४ आहे. सध्या लोकसभेत ५४२ आणि राज्यसभेत २३९ खासदार आहेत. एकूण ७८१ खासदारांना मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे कमीत कमी ३९१ खासदारांचा पाठिंबा असेल तो उमेदवार निवडणुकीत विजयी होईल. आता या तिन्ही पक्षांनी मतदानात भाग न घेतल्याने दोन्ही सभागृहातील खासदारांची संख्या ७६७ इतकी होईल. त्यामुळे विजयासाठी ३८४ खासदारांची गरज आहे. हे तिन्ही पक्ष विरोधी आहेत परंतु मागील ११ वर्षापासून ते सरकारशी जवळीक साधत आलेत. अकाली दल एनडीएचा भाग होती. परंतु बीजेडी, बीआरएस आघाडीत नसतानाही सरकारला पाठिंबा देत होती. सध्या एनडीएच्या बाजूने ४३६ खासदारांचा पाठिंबा दिसून येतो, तर सुदर्शन रेड्डी यांच्यासोबत ३२४ खासदार आहेत. या दोघांमध्ये ११२ मतांचा फरक दिसून येत आहे. मात्र निकालानंतर खरे चित्र लोकांसमोर येणार आहे. 

टॅग्स :ParliamentसंसदNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा