शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

टोल नाक्यांवर रविवारपासून वाहनांना फास्टॅग आवश्यक; वेळ आणि इंधनाचीही होईल बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 06:02 IST

राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग प्रणाली सुरू होणार असली तरी ज्यांच्याकडे फास्टॅग नाही

नवी दिल्ली : देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर रविवार, १५ डिसेंबरपासून फास्टॅग प्रणाली सुरू होत असून, त्यामुळे वाहनचालकांना ताबडतोबीने फास्टॅग विकत घेणे गरजेचे झाले आहे. याआधी केंद्र सरकारने १ डिसेंबरपासून फास्टॅग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर त्यास १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.

राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग प्रणाली सुरू होणार असली तरी ज्यांच्याकडे फास्टॅग नाही, अशा वाहनचालकांची अडचण होऊ नये, यासाठी काही काळासाठी तिथे एक लेन असेल. तिथे टोलची रक्कम रोख स्वरूपात स्वीकारली जाईल. मात्र काही दिवसांनी ती बंद केली जाणार आहे. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी आधीच फास्टॅग विकत घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.काही बँका, पेट्रोल पंप तसेच टोल नाक्यांवरील संबंधित कंपनीची कार्यालये येथे हे फास्टॅग विकत मिळू शकतील. आवश्यक तितक्या रकमेचा रिचार्जही करता येईल. ती रक्कम असेपर्यंत टोलनाक्यांवरील रांगेत अडकावे लागणार नाही आणि ती वाहने वेगाने जाऊ शकतील.

फास्टॅगची विक्री नोव्हेंबरात सुरू होताच आतापर्यंत ७0 लाख वाहनचालकांनी ते विकत घेतले आहेत. ही प्रणाली १ डिसेंबरपासून सुरू होणार हे २१ नोव्हेंबर रोजी जाहीर होताच २६ नोव्हेंबर या एका दिवशी १ लाख ३५ हजार लोकांनी ते विकत घेतले आहेत. वाहनचालकांना टोल नाक्यांवर रांगेत अडकण्याऐवजी फास्टॅग प्रणाली सोपी वाटत आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. फास्टॅगमुळे वेळ व इंधनाची मोठी बचत होणार असून, प्रदूषणही कमी होईल, असे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स या संस्थेने म्हटले आहे.

असा करा रिचार्ज

फास्टॅग असलेले वाहन संबंधित टोलनाक्यावरून जाईल तेव्हा टोलची रक्कम त्यातून आपोआप कापली जाईल; आणि वाहनचालकाच्या नोंदणीकृत मोबाइलवर तसा मेसेज येईल. फास्टॅगमधील रक्कम संपताच वा कमी होताच, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे तसेच बँका व किऑस्कवरून तो रिचार्ज करता येईल. राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाके व आरटीओमध्ये ती सुविधा असेल.

टॅग्स :highwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकIndiaभारत