शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 17:04 IST

Ranjit Savarkar reaction on Gundu Rao Controversial statement on Veer Savarkar: "सावरकर मांसाहारी होते, त्यांनी गायींच्या कत्तलीला कधीच विरोध केला नाही", असे कर्नाटकचे मंत्री गुंडू राव म्हणाले.

Karnataka minister Gundu Rao Controversial statement on Veer Savarkar: कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. भाजपाच्या नेतेमंडळींनी गुंडू राव यांच्यावर टीका केल्यानंतर आता वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर ( grandson Ranjit Savarkar ) यांनीही काँग्रेस आणि दिनेश गुंडू राव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी या वक्तव्याचा निषेध करत हे वक्तव्य म्हणजे वीर सावरकरांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. तसेच या कृत्याविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा (defamation case) करणार असल्याचेही जाहीर केले आहे.

कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी वीर सावरकरांबाबत वादग्रस्त विधान केले. "सावरकर ब्राह्मण होते, तरीही ते गोमांस खात होते. त्यांचे विचार मूलगामी असले तरी त्यांनी आधुनिकता स्वीकारली. सावरकरांनी गायींच्या कत्तलीला कधीच विरोध केला नाही", असे विधान गुंडू राव यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर रणजित सावरकर यांनी रोखठोक शब्दांत प्रतिक्रिया दिली. विधानाचा निषेध करतानाच त्यांनी कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांवर मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला.

दरम्यान, या विषयाव्यतिरिक्त रणजित सावरकर यांनी महाराष्ट्रातील काही गोष्टींबद्दलही मत व्यक्त केले. ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्य लाचलुचपत मुक्त करावे लागेल. कारण लाचखोरीमुळे जनतेला त्रास सहन करावा लागतोय. बांगलादेशी, रोहिंग्या अफगाणी आणि पाकिस्तानी बेकायदेशीरपणे देशात स्थायिक झाले आहेत. देश वाचवायचा असेल तर त्यांना देशाबाहेर हाकलावे लागेल.

सावरकर पुढे म्हणाले की, आम्ही नागरी समाजाच्या सहकार्याने एनआरसी आणण्याच्या समर्थनात आहोत. केंद्र सरकार एनआरसी लागू करणार नाही, परंतु आम्ही ते नक्कीच करणार आहोत. महाराष्ट्रात घुसलेल्या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी आणि देशात अवैधरित्या येणाऱ्यांना हाकलण्यासाठी, एनआरसी चळवळीच्या वतीने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. लोकांनी एनआरसी चळवळीत भाग घेतला पाहिजे. कारण सुमारे ८० लाख ते १ कोटी घुसखोर महाराष्ट्रात घुसले आहेत. त्यामुळे राज्यासमोर अनेक आव्हाने आहेत. हे घुसखोर स्लीपर सेलचे काम करतात, ज्यामुळे देशाचे नुकसान होते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरKarnatakकर्नाटकministerमंत्रीcongressकाँग्रेस