शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 17:04 IST

Ranjit Savarkar reaction on Gundu Rao Controversial statement on Veer Savarkar: "सावरकर मांसाहारी होते, त्यांनी गायींच्या कत्तलीला कधीच विरोध केला नाही", असे कर्नाटकचे मंत्री गुंडू राव म्हणाले.

Karnataka minister Gundu Rao Controversial statement on Veer Savarkar: कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. भाजपाच्या नेतेमंडळींनी गुंडू राव यांच्यावर टीका केल्यानंतर आता वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर ( grandson Ranjit Savarkar ) यांनीही काँग्रेस आणि दिनेश गुंडू राव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी या वक्तव्याचा निषेध करत हे वक्तव्य म्हणजे वीर सावरकरांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. तसेच या कृत्याविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा (defamation case) करणार असल्याचेही जाहीर केले आहे.

कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी वीर सावरकरांबाबत वादग्रस्त विधान केले. "सावरकर ब्राह्मण होते, तरीही ते गोमांस खात होते. त्यांचे विचार मूलगामी असले तरी त्यांनी आधुनिकता स्वीकारली. सावरकरांनी गायींच्या कत्तलीला कधीच विरोध केला नाही", असे विधान गुंडू राव यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर रणजित सावरकर यांनी रोखठोक शब्दांत प्रतिक्रिया दिली. विधानाचा निषेध करतानाच त्यांनी कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांवर मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला.

दरम्यान, या विषयाव्यतिरिक्त रणजित सावरकर यांनी महाराष्ट्रातील काही गोष्टींबद्दलही मत व्यक्त केले. ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्य लाचलुचपत मुक्त करावे लागेल. कारण लाचखोरीमुळे जनतेला त्रास सहन करावा लागतोय. बांगलादेशी, रोहिंग्या अफगाणी आणि पाकिस्तानी बेकायदेशीरपणे देशात स्थायिक झाले आहेत. देश वाचवायचा असेल तर त्यांना देशाबाहेर हाकलावे लागेल.

सावरकर पुढे म्हणाले की, आम्ही नागरी समाजाच्या सहकार्याने एनआरसी आणण्याच्या समर्थनात आहोत. केंद्र सरकार एनआरसी लागू करणार नाही, परंतु आम्ही ते नक्कीच करणार आहोत. महाराष्ट्रात घुसलेल्या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी आणि देशात अवैधरित्या येणाऱ्यांना हाकलण्यासाठी, एनआरसी चळवळीच्या वतीने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. लोकांनी एनआरसी चळवळीत भाग घेतला पाहिजे. कारण सुमारे ८० लाख ते १ कोटी घुसखोर महाराष्ट्रात घुसले आहेत. त्यामुळे राज्यासमोर अनेक आव्हाने आहेत. हे घुसखोर स्लीपर सेलचे काम करतात, ज्यामुळे देशाचे नुकसान होते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरKarnatakकर्नाटकministerमंत्रीcongressकाँग्रेस