शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 17:04 IST

Ranjit Savarkar reaction on Gundu Rao Controversial statement on Veer Savarkar: "सावरकर मांसाहारी होते, त्यांनी गायींच्या कत्तलीला कधीच विरोध केला नाही", असे कर्नाटकचे मंत्री गुंडू राव म्हणाले.

Karnataka minister Gundu Rao Controversial statement on Veer Savarkar: कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. भाजपाच्या नेतेमंडळींनी गुंडू राव यांच्यावर टीका केल्यानंतर आता वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर ( grandson Ranjit Savarkar ) यांनीही काँग्रेस आणि दिनेश गुंडू राव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी या वक्तव्याचा निषेध करत हे वक्तव्य म्हणजे वीर सावरकरांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. तसेच या कृत्याविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा (defamation case) करणार असल्याचेही जाहीर केले आहे.

कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी वीर सावरकरांबाबत वादग्रस्त विधान केले. "सावरकर ब्राह्मण होते, तरीही ते गोमांस खात होते. त्यांचे विचार मूलगामी असले तरी त्यांनी आधुनिकता स्वीकारली. सावरकरांनी गायींच्या कत्तलीला कधीच विरोध केला नाही", असे विधान गुंडू राव यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर रणजित सावरकर यांनी रोखठोक शब्दांत प्रतिक्रिया दिली. विधानाचा निषेध करतानाच त्यांनी कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांवर मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला.

दरम्यान, या विषयाव्यतिरिक्त रणजित सावरकर यांनी महाराष्ट्रातील काही गोष्टींबद्दलही मत व्यक्त केले. ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्य लाचलुचपत मुक्त करावे लागेल. कारण लाचखोरीमुळे जनतेला त्रास सहन करावा लागतोय. बांगलादेशी, रोहिंग्या अफगाणी आणि पाकिस्तानी बेकायदेशीरपणे देशात स्थायिक झाले आहेत. देश वाचवायचा असेल तर त्यांना देशाबाहेर हाकलावे लागेल.

सावरकर पुढे म्हणाले की, आम्ही नागरी समाजाच्या सहकार्याने एनआरसी आणण्याच्या समर्थनात आहोत. केंद्र सरकार एनआरसी लागू करणार नाही, परंतु आम्ही ते नक्कीच करणार आहोत. महाराष्ट्रात घुसलेल्या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी आणि देशात अवैधरित्या येणाऱ्यांना हाकलण्यासाठी, एनआरसी चळवळीच्या वतीने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. लोकांनी एनआरसी चळवळीत भाग घेतला पाहिजे. कारण सुमारे ८० लाख ते १ कोटी घुसखोर महाराष्ट्रात घुसले आहेत. त्यामुळे राज्यासमोर अनेक आव्हाने आहेत. हे घुसखोर स्लीपर सेलचे काम करतात, ज्यामुळे देशाचे नुकसान होते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरKarnatakकर्नाटकministerमंत्रीcongressकाँग्रेस