शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अपघातानंतर लगेचच वंदे भारत एक्सप्रेस रुळावर परतली, अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे घेणार काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 12:39 IST

मुंबई सेंट्रलपासून गांधीनगरपर्यंत जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला काल ६ सप्टेंबर रोजी अपघात झाला. वटवा-मणिनगर स्थानकाजवळ म्हशींच्या कळपाला धडकल्याने या रेल्वेचे मोठे नुकसान झाले होते.

मुंबई सेंट्रलपासून गांधीनगरपर्यंत जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसरेल्वेला काल ६ सप्टेंबर रोजी अपघात झाला. वटवा-मणिनगर स्थानकाजवळ म्हशींच्या कळपाला धडकल्याने या रेल्वेचे मोठे नुकसान झाले होते. या अपघातात इंडिनचा पुढचा भाग तुटला. अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी वंदे भारत एक्सप्रेस दुरुस्त होऊन रेल्वे रुळावर दाखल झाली आहे. 

वंदे भारत एक्सप्रेसचा पुढचा भाग मुंबई मध्य रेल्वेच्या कोचिंग केअर सेंटरमध्ये दुरुस्त करण्यात आला आहे. या रेल्वेचा फक्त पुढचा भाग खराब झाला आहे. या संदर्भात रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर यांनी माहिती दिली.

Vande Bharat Express Accident: मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात, मोठी दुर्घटना टळली

रेल्वे पटरी शेजारी असणाऱ्या गावातील लोकांना जनावरांना पटरीवर सोडू न देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे गांधीनगर-अहमदाबाद सेक्शनवर ट्रेनचा वेग ताशी १६० किमीपर्यंत वाढवण्याचे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कुंपण घालण्याचे काम करणार असल्याची माहिती, ठाकूर यांनी दिली.

काल रेल्वे रुळावर अचानक ३-४ म्हैशी आल्याने हा अपघात झाला आहे. अपघातानंतर ८ मिनिटांत गाडी गांधीनगरकडे रवाना झाली होती आणि नियोजित वेळेत पोहोचली होती.

मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात

अहमदाबाद - मुंबई सेंट्रल येथून गुजरातमधील गांधीनगर येथे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला काल गुरुवारी अपघात झाला . सकाळी सुमारे ११.१५ च्या सुमासार वटवा आणि मणिनगरदरम्यान रुळांवर म्हैशींचं कळप आल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे ट्रेनच्या इंजिनाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच ३० सप्टेंबर रोजी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. तेव्हा ही गाडी अहमदाबाद येथून दुपारी २ वाजता निघाली होती. ही ट्रेन संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचली होती. नव्या वंदे भारत एक्स्प्रेसने अहमदाबाद ते मुंबई हे ४९२ किमी अंतर साडे पाच तासांत पूर्ण केले होते.  

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसrailwayरेल्वे