शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

अपघातानंतर लगेचच वंदे भारत एक्सप्रेस रुळावर परतली, अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे घेणार काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 12:39 IST

मुंबई सेंट्रलपासून गांधीनगरपर्यंत जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला काल ६ सप्टेंबर रोजी अपघात झाला. वटवा-मणिनगर स्थानकाजवळ म्हशींच्या कळपाला धडकल्याने या रेल्वेचे मोठे नुकसान झाले होते.

मुंबई सेंट्रलपासून गांधीनगरपर्यंत जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसरेल्वेला काल ६ सप्टेंबर रोजी अपघात झाला. वटवा-मणिनगर स्थानकाजवळ म्हशींच्या कळपाला धडकल्याने या रेल्वेचे मोठे नुकसान झाले होते. या अपघातात इंडिनचा पुढचा भाग तुटला. अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी वंदे भारत एक्सप्रेस दुरुस्त होऊन रेल्वे रुळावर दाखल झाली आहे. 

वंदे भारत एक्सप्रेसचा पुढचा भाग मुंबई मध्य रेल्वेच्या कोचिंग केअर सेंटरमध्ये दुरुस्त करण्यात आला आहे. या रेल्वेचा फक्त पुढचा भाग खराब झाला आहे. या संदर्भात रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर यांनी माहिती दिली.

Vande Bharat Express Accident: मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात, मोठी दुर्घटना टळली

रेल्वे पटरी शेजारी असणाऱ्या गावातील लोकांना जनावरांना पटरीवर सोडू न देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे गांधीनगर-अहमदाबाद सेक्शनवर ट्रेनचा वेग ताशी १६० किमीपर्यंत वाढवण्याचे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कुंपण घालण्याचे काम करणार असल्याची माहिती, ठाकूर यांनी दिली.

काल रेल्वे रुळावर अचानक ३-४ म्हैशी आल्याने हा अपघात झाला आहे. अपघातानंतर ८ मिनिटांत गाडी गांधीनगरकडे रवाना झाली होती आणि नियोजित वेळेत पोहोचली होती.

मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात

अहमदाबाद - मुंबई सेंट्रल येथून गुजरातमधील गांधीनगर येथे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला काल गुरुवारी अपघात झाला . सकाळी सुमारे ११.१५ च्या सुमासार वटवा आणि मणिनगरदरम्यान रुळांवर म्हैशींचं कळप आल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे ट्रेनच्या इंजिनाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच ३० सप्टेंबर रोजी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. तेव्हा ही गाडी अहमदाबाद येथून दुपारी २ वाजता निघाली होती. ही ट्रेन संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचली होती. नव्या वंदे भारत एक्स्प्रेसने अहमदाबाद ते मुंबई हे ४९२ किमी अंतर साडे पाच तासांत पूर्ण केले होते.  

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसrailwayरेल्वे