शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘वंदे भारत’ने बदलला भारतीय रेल्वेचा चेहरा, प्रवासवेळेत मोठी बचत; स्लीपर कोच लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 06:38 IST

अपघाताची तीव्रता रोखण्यासाठी ‘कवच’ प्रणालीचा वापर; प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

ऋषिराज तायडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारतात १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली. तेव्हापासून मागील १७० वर्षांमध्ये भारतीय रेल्वेत आमूलाग्र बदल झालेत; परंतु ‘वंदे भारत’ रेल्वेमुळे देशातील रेल्वेचा खऱ्या अर्थाने चेहरा बदलला. पारंपरिक रेल्वेच्या तुलनेत पूर्णतः ‘मेक इन इंडिया’ डिझाइन व बांधणी केलेल्या ‘वंदे भारत’ने भारतीय प्रवाशांना सेमी हायस्पीड रेल्वेचा अनुभव दिला.

किती ताकदीचे आहे इंजिन?

कोणतीही रेल्वे म्हटली की, स्वतंत्र लोकोमोटिव्ह इंजिन जोडावे लागते. त्यातही घाट किंवा चढण असलेल्या भागात अतिरिक्त इंजिन जोडण्याची वेळ येते. त्यात बराचसा वेळही जातो. परंतु ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमध्येच शक्तिशाली इंजिन अंतर्भूत असल्याने ते स्वतंत्रपणे जोडण्याची आवश्यकता नाही.  ‘वंदे भारत’मध्ये प्रत्येकी ८४० किलोवॅटचे ८ मोटर इंजिन आहे. त्यामुळे ‘वंदे भारत’ची इंजिन क्षमता इतर इंजिनांपेक्षा दीडपट ते दुप्पट आहे.

स्लीपर कोच, वंदे मेट्रो लवकरच

या रेल्वे सेवेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, लवकरच ‘वंदे भारत’मध्ये स्लीपर कोच सुविधा सुरू होणार आहे. लोकल, मेट्रोच्या धर्तीवर ‘वंदे मेट्रो’ सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. १०० किलोमीटर अंतरामधील शहरांदरम्यान ब्रॉडगेज मार्गांवरून ही सेवा सुरू करण्याबाबत रेल्वेमंत्री वैष्णव यांनी भाष्य केले होते.

‘वंदे भारत’ची वैशिष्ट्ये

  • अपघाताची तीव्रता रोखण्यासाठी ‘कवच’ प्रणालीचा वापर
  • प्रत्येक डब्यात प्रवाशांना माहिती देण्यासाठी ऑडिओ-व्हिज्युअल पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिम 
  • संपूर्णतः स्वयंचलित दरवाजे; संपूर्ण एक्स्प्रेसमध्ये सीलबंद गँगवे 
  • एक्झिक्युटिव्ह डब्यांमध्ये फिरती आसनव्यवस्था 
  • प्रत्येक सीटजवळ मोबाइल चार्जिंग सुविधा
  • हॉट केस, बॉटल कूलर, हॉट वॉटर बॉयलरसह मिनी पॅन्ट्रीकार 
  • बायो-व्हॅक्युम श्रेणीतील स्वच्छतागृहे; दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा
  • प्रत्येक डब्यात आपत्कालीन खिडक्या, अलार्म पुश बटन, टॉक बॅक युनिट, अग्निशमन यंत्रणा

प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

‘वंदे भारत’मध्ये प्रवाशांना दर्जेदार प्रवासी सुविधा दिली जाते. मध्य रेल्वेवरील सर्वच ‘वंदे भारत’ला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून अनेक फेऱ्या ९० टक्क्यांहून अधिक भारमानासह धावत आहे.- प्रवीण पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस