शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

‘वंदे भारत’ने बदलला भारतीय रेल्वेचा चेहरा, प्रवासवेळेत मोठी बचत; स्लीपर कोच लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 06:38 IST

अपघाताची तीव्रता रोखण्यासाठी ‘कवच’ प्रणालीचा वापर; प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

ऋषिराज तायडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारतात १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली. तेव्हापासून मागील १७० वर्षांमध्ये भारतीय रेल्वेत आमूलाग्र बदल झालेत; परंतु ‘वंदे भारत’ रेल्वेमुळे देशातील रेल्वेचा खऱ्या अर्थाने चेहरा बदलला. पारंपरिक रेल्वेच्या तुलनेत पूर्णतः ‘मेक इन इंडिया’ डिझाइन व बांधणी केलेल्या ‘वंदे भारत’ने भारतीय प्रवाशांना सेमी हायस्पीड रेल्वेचा अनुभव दिला.

किती ताकदीचे आहे इंजिन?

कोणतीही रेल्वे म्हटली की, स्वतंत्र लोकोमोटिव्ह इंजिन जोडावे लागते. त्यातही घाट किंवा चढण असलेल्या भागात अतिरिक्त इंजिन जोडण्याची वेळ येते. त्यात बराचसा वेळही जातो. परंतु ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमध्येच शक्तिशाली इंजिन अंतर्भूत असल्याने ते स्वतंत्रपणे जोडण्याची आवश्यकता नाही.  ‘वंदे भारत’मध्ये प्रत्येकी ८४० किलोवॅटचे ८ मोटर इंजिन आहे. त्यामुळे ‘वंदे भारत’ची इंजिन क्षमता इतर इंजिनांपेक्षा दीडपट ते दुप्पट आहे.

स्लीपर कोच, वंदे मेट्रो लवकरच

या रेल्वे सेवेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, लवकरच ‘वंदे भारत’मध्ये स्लीपर कोच सुविधा सुरू होणार आहे. लोकल, मेट्रोच्या धर्तीवर ‘वंदे मेट्रो’ सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. १०० किलोमीटर अंतरामधील शहरांदरम्यान ब्रॉडगेज मार्गांवरून ही सेवा सुरू करण्याबाबत रेल्वेमंत्री वैष्णव यांनी भाष्य केले होते.

‘वंदे भारत’ची वैशिष्ट्ये

  • अपघाताची तीव्रता रोखण्यासाठी ‘कवच’ प्रणालीचा वापर
  • प्रत्येक डब्यात प्रवाशांना माहिती देण्यासाठी ऑडिओ-व्हिज्युअल पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिम 
  • संपूर्णतः स्वयंचलित दरवाजे; संपूर्ण एक्स्प्रेसमध्ये सीलबंद गँगवे 
  • एक्झिक्युटिव्ह डब्यांमध्ये फिरती आसनव्यवस्था 
  • प्रत्येक सीटजवळ मोबाइल चार्जिंग सुविधा
  • हॉट केस, बॉटल कूलर, हॉट वॉटर बॉयलरसह मिनी पॅन्ट्रीकार 
  • बायो-व्हॅक्युम श्रेणीतील स्वच्छतागृहे; दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा
  • प्रत्येक डब्यात आपत्कालीन खिडक्या, अलार्म पुश बटन, टॉक बॅक युनिट, अग्निशमन यंत्रणा

प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

‘वंदे भारत’मध्ये प्रवाशांना दर्जेदार प्रवासी सुविधा दिली जाते. मध्य रेल्वेवरील सर्वच ‘वंदे भारत’ला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून अनेक फेऱ्या ९० टक्क्यांहून अधिक भारमानासह धावत आहे.- प्रवीण पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस