शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

वाजपेयी, मालवीय भारतरत्नचे मानकरी

By admin | Updated: December 25, 2014 03:06 IST

भाजपाचे मुत्सद्दी नेते आणि विविध राजकीय विचारधारांचे आघाडी सरकार चालविण्यात सर्वाधिक यशस्वी ठरलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी

नवी दिल्ली : भाजपाचे मुत्सद्दी नेते आणि विविध राजकीय विचारधारांचे आघाडी सरकार चालविण्यात सर्वाधिक यशस्वी ठरलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच स्वातंत्र्यसैनिक, हिंदू महासभेचे नेते व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पं. मदन मोहन मालवीय (मरणोत्तर) यांना भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला़ ओजस्वी वाणी लाभलेला कविमनाचा राजकारणी आणि सरस्वतीचे वरदान लाभलेला द्रष्टा शिक्षणतज्ज्ञ व तेजस्वी स्वातंत्र्यसेनानी अशा दोन महानुभावांना एकाच वेळी हा सन्मान देण्याच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. गुरुवारी वाजपेयी यांचा वाढदिवस असून ते वयाची नव्वद वर्षे पूर्ण करीत आहे़ पं. मालवीय यांचीही उद्या १५३ वी जयंती आहे़ याचे औचित्य साधून त्याच्या पूर्वसंध्येला या सन्मानाची घोषणा करण्यात आली़ राष्ट्रपती भवनाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली़ येत्या प्रजासत्ताक दिनी हा सन्मान प्रदान करण्यात येईल़आतापर्यंत ४३ महनीय व्यक्तींना भारतरत्नने गौरविण्यात आले आहे़ गतवर्षी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि शास्त्रज्ञ सी़एऩआऱ राव यांना या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले होते़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: राष्ट्रपतींकडे या द्वयींना भारतरत्नने गौरविण्यात यावे, अशी विनंती केली होती़ या पुरस्कारासाठी कुठल्याही औपचारिक शिफारशीची गरज नाही़ गेल्या अनेक वर्षांपासून वाजपेयींना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे़