शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

...म्हणून उत्तराखंडच्या पर्यटनमंत्र्यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना पाठवलं 'रामायण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 10:58 IST

उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना  रामायण या प्राचीन ग्रंथाची एक प्रत पाठवली आहे.

नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये चीनशी झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले. त्यानंतर चीनविरोधातभारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच दरम्यान उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना  रामायण या प्राचीन ग्रंथाची एक प्रत पाठवली आहे. तसेच सतपाल महाराज यांनी जिनपिंग यांना रावणाच्या विस्तारवादी विचारसरणीमुळे झालेल्या नुकसानीवरून धडा घेण्याचा सल्लाही दिला आहे. 

भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला.  भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारताने या कारवाईला जशास तसे उत्तर देत चीनचे 43 सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. मात्र चीनने अद्याप मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही. यानंतर आता सतपाल महाराज यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना रामायण पाठवलं आहे. रावणाच्या विस्तारवादी विचारसरणीमुळे त्याचा कोणता परिणाम झाला हा संदेश चीनच्या राष्ट्रध्यक्षांपर्यंत पोहोचवायचा असल्याने त्यांना रामायण हा ग्रंथ पाठवल्याचं सतपाल यांनी सांगितलं.

"चीनच्या सैनिकांनी ज्याप्रकारे गलवान खोऱ्यात आपल्या विस्तारवादी विचारणीमुळे भारतीय जवानांवर हल्ला केला तो प्रकार अतिशय निषेधार्ह आहे" असं सतपाल महाराज यांनी म्हटलं आहे. तसेच विस्तारवादी व्यक्ती किंवा विस्तारवादी देशाची कधीही भरभराट होत नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष रामायणातून काही बोध घेऊन बदल करतील अशी अपेक्षा असल्याचं देखील म्हटलं. "जी व्यक्ती विस्तारवादी विचारसणीचा अवलंब करते त्याचा अंत कसा होतो हे रामायणातून सांगण्यात आलं आहे. सध्या चीनचं सरकार जनतेचा मोठ्या प्रमाणात पैसा हा सैन्याची ताकद वाढवण्यावर खर्च करत आहे. ज्या आजाराने आज संपूर्ण जग त्रस्त आहे असा आजार थांबवण्यासाठी हा पैसा खर्च करावा" असंही सतपाल महाराज यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेकांनी तर आपल्या फोनमधून चिनी अ‍ॅप्स देखील हटवून याची सुरुवात केली होती. याच दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने चीनला मोठा दणका दिला. लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली. यानंतर आता केंद्र सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. भारत आणि चीनदरम्यान असलेल्या तणावानंतर भारतात गुंतवणूकीसाठी आलेल्या 50 चीनी कंपन्यांच्या प्रस्तावावर फेरविचार करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. हा निर्णय झाला तर तो चीनला आणखी एक मोठा दणका असू शकतो असं म्हटलं जात आहे. देशात केंद्र सरकारने नवीन स्क्रीनिंग पॉलिसी आणली आहे. यामध्ये भारताच्या शेजारच्या देशांना भारतात कुठेही गुंतवणूक करायची असल्यास त्यांना आधी केंद्र सरकारची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"राहुल गांधी काही डॉक्टर नाहीत", 'त्या' आरोपांवर थेट कंपनीने दिलं प्रत्युत्तर

"मी महाराज किंवा टायगर नाही, कमलनाथ आहे; कोण मांजर आणि कोण उंदीर हे जनता ठरवेल"

सावधान! 3 वर्षांनी पुन्हा आलाय 'हा' खतरनाक Android Virus; फक्त एक मेसेज अन्...

धक्कादायक! "माझी हत्या होऊ शकते", कोरोनाग्रस्त पत्रकाराच्या आत्महत्येनंतर 'ते' चॅट व्हायरल

राहुल गांधींनी पुन्हा एकदा साधला मोदी सरकारवर निशाणा, 'हे' प्रश्न विचारत केला हल्लाबोल

कामासाठी काय पण! लग्न मंडपातच नवरीने घेतला लॅपटॉप अन्...; Video तुफान व्हायरल

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनramayanरामायण