शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पंख्याला हात लावताच विजेच्या जोरदार धक्का; चार सख्या भावंडांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 20:47 IST

या धक्कादायक घटनेने गावावर शोककळा पसरली.

उन्नाव: उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील पंख्यामुळे विजेचा शॉक लागल्याने एकाच कुटुंबातील चार निष्पाप मुलांचा मृत्यू झाला. एकापाठोपाठ चारही मुलांना शॉक लागल्याने सर्वांचा जागीच मृत्यू झाला. एकाच वेळी चार भाऊ-बहिणीच्या मृत्यूने संपूर्ण गावात खळबळ उडाली. 

उन्नाव जिल्ह्यातील बारसगवार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालमन खेडा गावात ही घटना घडली. गावातील रहिवासी वीरेंद्र कुमार यांच्या 9 वर्षीय मयंक, 2 वर्षीय हिमांशी, 6 वर्षीय हिमांक आणि 4 वर्षीय मानसीचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सर्व मृत मुलांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले.

चारही मुले एकामागून एक पंख्याला चिकटलीरविवारी वीरेंद्र सिंह पत्नीसह शेतात गेले होते. त्यांची मुले घरीच होती. घरात पंखा लावला, त्यातून विद्युत प्रवाह येत होता. अचानक एका मुलाला पंख्याचा विजेचा धक्का बसला. विजेचा धक्का लागल्याने तो ओरडू लागला. दुसऱ्या मुलाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही विजेचा धक्का बसला. यानंतर एक एक करून चारही मुलांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. 

घरातून लहान मुलांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले. मुलांचा वेदनादायक मृत्यू पाहून उपस्थितांनाही धक्का बसला. याची माहिती वीरेंद्र आणि त्यांच्या पत्नीला मिळताच त्यांनी आक्रोश केला. ज्या घराच्या अंगणात चिमुकले खेळायचे, त्याच घरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. हे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तरले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू