शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
2
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
3
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
4
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
5
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
8
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
9
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
10
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
11
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
12
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
13
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
14
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
15
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
16
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
17
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
18
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
19
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
20
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

"बाबाच्या सेवेकऱ्याने धक्काबुक्की केली अन्..."; हाथरसमधल्या घटनेची धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 13:54 IST

Hathras Stampede Updates : उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे एका सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत १२१ लोक ठार झाल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Hathras Stampede :उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन तब्बल १२१ भाविकांचा मृत्यू झाला. नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा याच्या प्रवचनासाठी आलेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सेवेकरी देव प्रकाश आणि अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. दुसरीकडे हाथरसचे उप जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची संपूर्ण माहिती दिली.

मंगळवारी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात भोले बाबाच्या सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण अधिक आहे. या कार्यक्रमात दोन ते अडीच लाखाच्या आसपास भाविक आले होते. भोले बाबाचे प्रवचन संपल्यानंतर  त्याचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता भाविकांनी एकच गर्दी जमली. यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि १२१ लोकांचा मृत्यू झाली तर अनेकजण जखमी झाले. आता उपजिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घडलेल्या घटनेबाबत विस्तृत माहिती दिली.

"सत्संग सुरु असलेल्या ठिकाणी दोन लाखांहून अधिक लोक उपस्थित होते. दुपारी १२.३० वाजत नारायण साकार हरी (भोले बाबा) सत्संग मंडपात पोहोचले आणि हा कार्यक्रम एक तास चालला. त्यानंतर दुपारी १.४० च्या सुमारास नारायण साकार हरी (भोले बाबा) मंडपामधून बाहेर पडले. महामार्ग-९१ ज्या मार्गाने भोले बाबा बाहेर पडत होते. सत्संगी स्त्रिया/पुरुष/मुले इत्यादींनी त्याच्या पायाची माती घेऊन दर्शनाची खूण म्हणून कपाळावर लावली व चरणस्पर्श करून आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. त्यावेळी बाजूला व मध्यभागी बांधलेल्या दुभाजकावर मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी उभे होते. जी.टी.रोड, दुभाजकावरून जेव्हा लोक उड्या मारून बाबाच्या वाहनाकडे धावू लागले. गर्दी बाबांपर्यंत पोहोचू नये म्हणून त्यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी आणि सेवेकऱ्यांनी काही लोकांना धक्काबुक्की केली आणि ते खाली पडले. त्यामुळे तो जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि घाबरला. तिथून बाहेर पडण्यासाठी लोकांनी जवळच असलेल्या मोकळ्या मैदानाकडे धाव घेतली जिथे अनेक लोक एका उतारावरुन घसरले आणि खाली पडले. इतर लोक त्यांच्या अंगावरुन धावू लागले. यामुळे ते पुन्हा उठून उभे राहू शकले नाहीत आणि गर्दी त्याच्या अंगावरुन इकडे तिकडे धावू लागली. ज्यामध्ये अनेक महिला, पुरुष आणि मुले जखमी/गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित महसूल व पोलीस सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लोकांना रूग्णवाहिका व इतर माध्यमातून सिरळ येथील घटनास्थळाजवळील रूग्णालये आणि सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवले. जिथे ८९ भाविकांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आणि काही भाविकांना उपचारासाठी एटा जिल्ह्यात पाठवण्यात आले. तिथे २७ भाविकांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अशा प्रकारे, एकूण मृतांची संख्या ११६ वर पोहोचली आणि एकूण २३ लोक जखमी झाले," अशी माहिती उपजिल्हाधिकारी सिकंदर राव यांनी दिली. 

दरम्यान, या कार्यक्रमाची प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली होती. मात्र आयोजकांकडून केवळ ८० हजार लोक येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र कार्यक्रमाच्या दिवशी अडीच लाखांहून अधिक भाविक सत्संगसाठी आले होते. त्यानंतरही आयोजकांनी भाविकांची संख्या पोलिसांपासून लपवून ठेवली. मात्र सकाळपासूनच कार्यक्रमाचे सुरु असताना अडीच लाख लोकांची गर्दी पोलिसांना कशी दिसली नाही असाही सवाल आता केला जात आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघातyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिस