शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 16:11 IST

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: अमेठी लोकसभा मतदारसंघामध्ये यंदाच्या निवडणुकीतही स्मृती इराणी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसकडून राहुल गांधी यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान, मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने अमेठी मतदारसंघातून उमेदवार जाहीर करत या लढतीत रंगत आणली आहे.

काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघाला भाजपाने २०१९ च्या निवडणुकीत सुरुंग लावला होता. त्या  निवडणुकीत भाजपाच्या स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा तब्बल ५५ हजार मतांनी पराभव केला होता. आता यंदाच्या निवडणुकीतही येते स्मृती इराणी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. भाजपाने स्मृती इराणी यांना उमेदवारी देऊन येथे प्रचारही सुरू केला आहे. मात्र काँग्रेसकडून राहुल गांधी यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. येथून राहुल गांधी निवडणूक लढणार की नाही याबाबत काँग्रेसने अजूनही गोपनीयता बाळगली आहे. दरम्यान, मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने अमेठी मतदारसंघातून उमेदवार जाहीर करत या लढतीत रंगत आणली आहे.

 बहुजन समाज पार्टीने अमेठीमधून रविप्रकाश मौर्य यांना उमेदवारी दिली आहे. रविप्रकाश यांनी २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अयोध्या येथून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता. आता बसपाने त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. बसपाच्या खेळीने इंडिया आघाडी आणि भाजपा दोघांचंही टेन्शन वाढवलं आहे. जातीनिहाय जनगणनेची मागणी केल्याने ओबीसी मतं एकगठ्ठा मिळतील, अशी सपा आणि काँग्रेसची अपेक्षा होती. मात्र बसपाच्या उमेदवारामुळे मतविभागणीचा धोका निर्माण झाला आहे. तसेच दलित आणि ओबीसी मतदार बसपाकडे वळणं भाजपालाही परवडणारं नाही. त्यामुळे अमेठी येथून रिंगणात उतरलेले रविप्रकाश भाजपाच्या स्मृती इराणी की काँग्रेसच्या उमेदवारासमोरील अडचणी वाढवणार याची चर्चा सुरू झाली आहे.

 अमेठीमधील २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकल्यास बसपाच्या या डावामुळे काँग्रेस आणि भाजपा दोघांचही नुकसान होऊ शकतं. तसेच येथील लढाई तिरंगी होऊ शकते. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या राहुल गांधी यांना ४ लाख ८  हजार ६५१ मतं मिळाली होती. तर स्मृती इराणी यांना ३ लाख ७४८  मतं मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या बसपाच्या धर्मेंद्र प्रताप यांना ५७ हजार ७१६ मतं मिलाली होती.  तर २०१९ मध्ये बसपा सपासोबत आघाडीमध्ये होती. तसेच त्यांनी अमेठीमध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी राहुल गांधी यांना ४ लाख १३ हजार ३९४ मतं मिळाली होती. तर स्मृती इराणी यांना ४ लाख ६८ हजार ५१४ मतं मिळाली होती. बसपाचा उमेदवार नसल्याने दलित मतदार भाजपाकडे वळले आणि त्याचं काँग्रेसला नुकसान झालं, असा दावा करण्यात आला होता.

यावेळी बसपाने उमेदवार दिला आहे. तसेच हा उमेदवार ओबीसी समाजातील आहे. मागच्या काही निवडणुका पाहिल्यास ओबीसी समजातून भाजपाला भरभरून मतदान केलं जातं. एका सर्व्हेनुसार मागच्या निवडणुकीत भाजपाला ७० टक्के ओबीसी मतं मिळाली होती. कुर्मी आणि कोयरी समाजातील ८० टक्के मतदारांनी मतदान केलं होतं. त्यामुळे बसपाने कोयरी समाजातील उमेदवार दिल्याने स्मृती इराणी यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

अमेठीमधील जातीगत समिकरणांचा विचार केल्यास या लोकसभा मतदारसंघात एकूण १७ लाख मतदार आहेत. त्यामध्ये ओबीसी ३४ टक्के आहेत. तर मुस्लिम २० टक्के, दलित २६ टक्के, ब्राह्मण ८ आणि ठाकूर १२ टक्के आहेत.  

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४amethi-pcअमेठीcongressकाँग्रेसBJPभाजपाBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीRahul Gandhiराहुल गांधीSmriti Iraniस्मृती इराणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४