शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 16:11 IST

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: अमेठी लोकसभा मतदारसंघामध्ये यंदाच्या निवडणुकीतही स्मृती इराणी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसकडून राहुल गांधी यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान, मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने अमेठी मतदारसंघातून उमेदवार जाहीर करत या लढतीत रंगत आणली आहे.

काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघाला भाजपाने २०१९ च्या निवडणुकीत सुरुंग लावला होता. त्या  निवडणुकीत भाजपाच्या स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा तब्बल ५५ हजार मतांनी पराभव केला होता. आता यंदाच्या निवडणुकीतही येते स्मृती इराणी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. भाजपाने स्मृती इराणी यांना उमेदवारी देऊन येथे प्रचारही सुरू केला आहे. मात्र काँग्रेसकडून राहुल गांधी यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. येथून राहुल गांधी निवडणूक लढणार की नाही याबाबत काँग्रेसने अजूनही गोपनीयता बाळगली आहे. दरम्यान, मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने अमेठी मतदारसंघातून उमेदवार जाहीर करत या लढतीत रंगत आणली आहे.

 बहुजन समाज पार्टीने अमेठीमधून रविप्रकाश मौर्य यांना उमेदवारी दिली आहे. रविप्रकाश यांनी २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अयोध्या येथून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता. आता बसपाने त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. बसपाच्या खेळीने इंडिया आघाडी आणि भाजपा दोघांचंही टेन्शन वाढवलं आहे. जातीनिहाय जनगणनेची मागणी केल्याने ओबीसी मतं एकगठ्ठा मिळतील, अशी सपा आणि काँग्रेसची अपेक्षा होती. मात्र बसपाच्या उमेदवारामुळे मतविभागणीचा धोका निर्माण झाला आहे. तसेच दलित आणि ओबीसी मतदार बसपाकडे वळणं भाजपालाही परवडणारं नाही. त्यामुळे अमेठी येथून रिंगणात उतरलेले रविप्रकाश भाजपाच्या स्मृती इराणी की काँग्रेसच्या उमेदवारासमोरील अडचणी वाढवणार याची चर्चा सुरू झाली आहे.

 अमेठीमधील २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकल्यास बसपाच्या या डावामुळे काँग्रेस आणि भाजपा दोघांचही नुकसान होऊ शकतं. तसेच येथील लढाई तिरंगी होऊ शकते. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या राहुल गांधी यांना ४ लाख ८  हजार ६५१ मतं मिळाली होती. तर स्मृती इराणी यांना ३ लाख ७४८  मतं मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या बसपाच्या धर्मेंद्र प्रताप यांना ५७ हजार ७१६ मतं मिलाली होती.  तर २०१९ मध्ये बसपा सपासोबत आघाडीमध्ये होती. तसेच त्यांनी अमेठीमध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी राहुल गांधी यांना ४ लाख १३ हजार ३९४ मतं मिळाली होती. तर स्मृती इराणी यांना ४ लाख ६८ हजार ५१४ मतं मिळाली होती. बसपाचा उमेदवार नसल्याने दलित मतदार भाजपाकडे वळले आणि त्याचं काँग्रेसला नुकसान झालं, असा दावा करण्यात आला होता.

यावेळी बसपाने उमेदवार दिला आहे. तसेच हा उमेदवार ओबीसी समाजातील आहे. मागच्या काही निवडणुका पाहिल्यास ओबीसी समजातून भाजपाला भरभरून मतदान केलं जातं. एका सर्व्हेनुसार मागच्या निवडणुकीत भाजपाला ७० टक्के ओबीसी मतं मिळाली होती. कुर्मी आणि कोयरी समाजातील ८० टक्के मतदारांनी मतदान केलं होतं. त्यामुळे बसपाने कोयरी समाजातील उमेदवार दिल्याने स्मृती इराणी यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

अमेठीमधील जातीगत समिकरणांचा विचार केल्यास या लोकसभा मतदारसंघात एकूण १७ लाख मतदार आहेत. त्यामध्ये ओबीसी ३४ टक्के आहेत. तर मुस्लिम २० टक्के, दलित २६ टक्के, ब्राह्मण ८ आणि ठाकूर १२ टक्के आहेत.  

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४amethi-pcअमेठीcongressकाँग्रेसBJPभाजपाBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीRahul Gandhiराहुल गांधीSmriti Iraniस्मृती इराणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४