शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

उत्तर प्रदेशात १ मे रोजी साजरा होणार महाराष्ट्र स्थापना दिवसाचा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 17:40 IST

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे राजभवनात 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्र स्थापना दिवसाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे राजभवनात 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्र स्थापना दिवसाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. या वर्षी लखनौमध्ये होणारा महाराष्ट्र दिवस सोहळा उत्तर प्रदेश सरकार, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र समाज लखनौ, मराठी समाज उत्तर प्रदेश आणि भातखंडे संगीत विश्वविद्यालयाच्यावतीने 1 आणि 2 मे रोजी राजभवनातच आयोजित करण्यात आला आहे. 1 मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुख्य अतिथी असतील, तर उत्तर प्रदेशाच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति दिलीप बाबासाहेब भोसले आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे हे विशेष अतिथी असतील.  

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा आणि सूचना मंत्री डॉ. नीळकंठ तिवारी हेही उपस्थित राहतील. 2 मे रोजी समारोपाच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य तसेच मंत्री मंडळातील ज्येष्ठ मंत्री डॉ. रिटा बहुगुणा जोशी, लक्ष्मी नारायण चौधरी, आशुतोष टंडन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. असेही राज्यपाल नाईक यांनी सांगितले. समारोहातील सांस्कृतिक कार्यक्रमाची व्यवस्था महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली असून पहिल्या दिवशी ‘भूपाळी ते भैरवी’ या संघातर्फे महाराष्ट्रातील 16 लोककला प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये भूपाळी, ओवी, आदिवासी नृत्य, कोळी नृत्य, छत्रपति शिवाजी महाराजांची आग्राहून सुटका यावर आधारित नाट्यनृत्य तर अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई तसेच लोकमान्य टिळकांची भूमिका असलेला गणेशोत्सव आदी विविध प्रकारचे 16 लोककला प्रकार सादर करण्यात येणार आहेत.  

दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 मे रोजी ‘नाट्यसंगीताची वाटचाल’ हा अरविंद पिळगावकर आणि अन्य कलाकारांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीही 1 आणि 2 मे 2017 रोजी लखनौमधील मराठी संस्थांच्यावतीने राजभवनातच महाराष्ट्र दिवसाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांनी मराठीचे वाल्मिकी ग.दि.माडगुळकर यांच्या गीत रामायणाचा कार्यक्रम प्रस्तुत केला होता, अशी माहितीही राज्यपाल नाईक यांनी दिली.

राज्यपाल नाईक यांनी सांगितले की, गेल्या वर्षी 30 डिसेंबर 2017 रोजी एक अभिनव कार्यक्रम करण्यात आला.  ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणारच’ हा लोकमान्य टिळकांचा अमर उद्घोष लखनौ मध्ये 1916 मध्ये झालेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनातील भाषणाचा भाग होता.  2017 मध्ये त्या कॉंग्रेस अधिवेशनाची शताब्दी होती. या निमित्ताने १०१ वर्ष झाल्याचे निमित्ताने या घटनेचा शानदार सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 30 डिसेंबर 2017 रोजी लखनौ येथे पार पडला.  त्याच कार्यक्रमात महाराष्ट्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यामध्ये सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्याचा सामंजस्य करार (MOU) करण्यात आला.  त्या सामंजस्य कराराचा भाग म्हणूनच येत्या 1 आणि2 मे रोजी महाराष्ट्र दिन सोहळा राजधानी लखनौ येथे साजरा करण्यात येणार आहे,असेही राज्यपाल नाईक यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांचं एक अतूट नाते आहे. प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात नाशिकच्या पंचवटीत राहिले. छत्रपति शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशीच्या गागाभट्टांनी केला. 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा सक्रीय सहभाग होता.  

उत्तर प्रदेशात लखनौ, कानपूर, आग्रा,वाराणसी, बरेली आदी महत्त्वाच्या शहरात मराठी भाषिकांच्या संघटना आहेत.त्यांच्यामार्फत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात मी जेव्हा जातो तेव्हा मला मी मुंबईत असल्याचीच जाणीव होत असते.  अनेक शहरांमध्ये मराठी भाषिकांच्या तीन-तीन चार-चार पिढ्या उत्तर प्रदेशात झाल्या आहेत.  उत्तर प्रदेशाच्या सामाजिक जीवनामध्ये ते पूर्णतः मिसळून गेले आहेत.  परंतु त्यांचा मराठी बाणाही जागृत आहे, याचा अनुभव मी गेले साडेतीन वर्षे घेत आहे.  त्याचाच आनंद लखनौमध्ये 1 आणि 2 मे रोजी उत्तर प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्यावतीने होणाऱ्या समारोहात मिळणार आहे.  या निमित्ताने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांचे संबंध अधिक स्नेहाचे होतील असा विश्वास राज्यपाल नाईक यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMaharashtraमहाराष्ट्रyogi adityanathयोगी आदित्यनाथ