शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

उत्तर प्रदेश सरकारच्या शेतकऱ्यांना नोटिसा; कृषी कायद्यांना विरोध केल्याने पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 06:42 IST

शांततेचा भंग हाेण्याची भीती, न्यायालयाने मागितले स्पष्टीकरण

लखनौ : कृषी कायद्यांना विराेध करणाऱ्या शेतकऱ्यांकडून शांततेचा भंग हाेण्याच्या भीतीने उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना १० लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक जातमुचलक्याच्या नाेटीस पाठविल्या आहेत. याविराेधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला याबाबत २ फेब्रुवारीपर्यंत खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.

उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील स्वत:चा ट्रॅक्टर असणाऱ्या शेतकऱ्यांना १९ जानेवारीला नाेटीस पाठविण्यात आल्या हाेत्या. जिल्ह्यात शेतकरी आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकरी कायदेभंग करतील, या भीतीने नाेटीस पाठविण्यात आल्या हाेत्या. त्यात शेतकऱ्यांना ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेची हमी सादर करण्यास सांगण्यात आले हाेते. या नाेटीसना विराेध करणारी याचिका समाजसेविका अरुंधती धुरू यांनी उच्च न्यायालयात दाखल केली हाेती. 

शेतकऱ्यांना प्रतिसाद देण्यासाठी अवधी देण्यात आलेला नाही. तसेच वैयक्तिक जातमुचलका आणि हमीची रक्कम खूप जास्त असून गरीब शेतकऱ्यांकडून अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे, असा दावा त्यांनी याचिकेतून केला हाेता.  परिस्थिती तणावग्रस्त असून शांततेचा भंग हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे दाेन्ही बाजूंना नाेटीसद्वारे बंधन टाकणे आवश्यक आहे, असे या नाेटीसमध्ये म्हटले आहे. 

२० शेतकरी नेत्यांना लूक आऊट नोटीस

  • प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये दिल्लीतील विविध भागांत व लाल किल्ला परिसरात जो हिंसाचार झाला, त्याप्रकरणी विविध एफआयआरमध्ये नावे नोंदविलेल्या ३७ पैकी २० शेतकरी नेत्यांवर लूक आउट नोटीस जारी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांना दिले आहेत.  आरोपी असलेल्या शेतकरी नेत्यांनी आपले पासपोर्ट दिल्ली पोलिसांकडे जमा करावेत, असा आदेशही केंद्र सरकारने दिला आहे.
  • दिल्ली पोलिसांशी ठरविलेल्या गोष्टी न पाळता या शेतकरी नेत्यांनी त्यांच्या विपरीत वर्तन केले. त्याबद्दल त्यांच्यावर कडक कारवाई का करण्यात येऊ नये? अशी विचारणा दिल्ली पोलिसांनी या नेत्यांकडे करावी, असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे.  २० शेतकरी नेत्यांनी आपले स्पष्टीकरण तीन दिवसांच्या आत सादर करायचे आहे. 
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdelhiदिल्लीFarmerशेतकरी