शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

उत्तर प्रदेश सरकारच्या शेतकऱ्यांना नोटिसा; कृषी कायद्यांना विरोध केल्याने पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 06:42 IST

शांततेचा भंग हाेण्याची भीती, न्यायालयाने मागितले स्पष्टीकरण

लखनौ : कृषी कायद्यांना विराेध करणाऱ्या शेतकऱ्यांकडून शांततेचा भंग हाेण्याच्या भीतीने उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना १० लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक जातमुचलक्याच्या नाेटीस पाठविल्या आहेत. याविराेधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला याबाबत २ फेब्रुवारीपर्यंत खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.

उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील स्वत:चा ट्रॅक्टर असणाऱ्या शेतकऱ्यांना १९ जानेवारीला नाेटीस पाठविण्यात आल्या हाेत्या. जिल्ह्यात शेतकरी आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकरी कायदेभंग करतील, या भीतीने नाेटीस पाठविण्यात आल्या हाेत्या. त्यात शेतकऱ्यांना ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेची हमी सादर करण्यास सांगण्यात आले हाेते. या नाेटीसना विराेध करणारी याचिका समाजसेविका अरुंधती धुरू यांनी उच्च न्यायालयात दाखल केली हाेती. 

शेतकऱ्यांना प्रतिसाद देण्यासाठी अवधी देण्यात आलेला नाही. तसेच वैयक्तिक जातमुचलका आणि हमीची रक्कम खूप जास्त असून गरीब शेतकऱ्यांकडून अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे, असा दावा त्यांनी याचिकेतून केला हाेता.  परिस्थिती तणावग्रस्त असून शांततेचा भंग हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे दाेन्ही बाजूंना नाेटीसद्वारे बंधन टाकणे आवश्यक आहे, असे या नाेटीसमध्ये म्हटले आहे. 

२० शेतकरी नेत्यांना लूक आऊट नोटीस

  • प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये दिल्लीतील विविध भागांत व लाल किल्ला परिसरात जो हिंसाचार झाला, त्याप्रकरणी विविध एफआयआरमध्ये नावे नोंदविलेल्या ३७ पैकी २० शेतकरी नेत्यांवर लूक आउट नोटीस जारी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांना दिले आहेत.  आरोपी असलेल्या शेतकरी नेत्यांनी आपले पासपोर्ट दिल्ली पोलिसांकडे जमा करावेत, असा आदेशही केंद्र सरकारने दिला आहे.
  • दिल्ली पोलिसांशी ठरविलेल्या गोष्टी न पाळता या शेतकरी नेत्यांनी त्यांच्या विपरीत वर्तन केले. त्याबद्दल त्यांच्यावर कडक कारवाई का करण्यात येऊ नये? अशी विचारणा दिल्ली पोलिसांनी या नेत्यांकडे करावी, असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे.  २० शेतकरी नेत्यांनी आपले स्पष्टीकरण तीन दिवसांच्या आत सादर करायचे आहे. 
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdelhiदिल्लीFarmerशेतकरी