शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
5
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
6
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
7
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
8
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
9
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
10
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
11
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
12
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
13
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
14
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
15
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
16
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
18
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
19
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
20
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक

दूध देणं बंद झाल्यानंतर गायीला सोडलं तर शेतकऱ्यावर दाखल होणार गुन्हा; योगी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 21:12 IST

Uttar pradesh: "कसाई आणि शेतकरी यांत फरक आहे. आम्ही शेतकऱ्यांची काळजी घेऊ कसायांची नाही. आपली जनावरे निराधार सोडणाऱ्यांविरोधात प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.”

बेवारस जणावरांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी आज योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दूध देणे बंद झाल्यानंतर, गायींना बेवारस सोडणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत. अशा शेतकऱ्यांविरुद्ध   प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असे यूपी सरकारने म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना पशुसंवर्धन मंत्री धरमपाल सिंह म्हणाले, "कसाई आणि शेतकरी यांत फरक आहे. आम्ही शेतकऱ्यांची काळजी घेऊ कसायांची नाही. आपली जनावरे निराधार सोडणाऱ्यांविरोधात प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.” ते विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सपा आमदार अवधेश प्रसाद यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

प्रसाद यांनी, भटक्या प्राण्यांच्या समस्येसंदर्भातील योजना आणि त्यांच्या मुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईसंदर्भात प्रश्न केला होता. यावर उत्तर देताना मंत्री म्हणाले, ही भटकी जनावरे नाहीत, त्यांना सोडण्यात आले आहे. त्यांना कोणी सोडले हे सर्वांना माहीत आहे. जेव्हा एक गाय दूध देते तेव्हा तीचे संगोपन केले जाते आणि जेव्हा ती दूध देणे बंद करते तेव्हा तिला सोडून दिले जाते.''

याशिवाय, राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांत 15 मेपर्यंत 6,187 गो निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यात तब्बल 8,38,015 जनावरांना ठेवण्यात आले आहेत, असेही धरमपाल सिंह यांनी सागितले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथcowगायAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार