शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कोरोनाचं भीषण वास्तव, यमुना नदीत आढळली वाहती प्रेतं,  उत्तर प्रदेशातील गावांमध्ये भयानक परिस्थिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 19:39 IST

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात यमुना नदीच्या प्रवाहात आता प्रेतं वाहून येत असल्याचं आढळून आलं आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी गावागावत प्रेतं थेट नदीच्या पात्रात सोडून दिले जात असल्याचं सांगितलं जात आहे. 

उत्तर प्रदेशात कोरोनाची परिस्थिती किती भयानक आहे हे एका धक्कादायक घटनेवरुन उघडकीस आलं आहे. उत्तर प्रदेशातील लहान लहान गावांवमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात यमुना नदीच्या प्रवाहात आता प्रेतं वाहून येत असल्याचं आढळून आलं आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी गावागावत प्रेतं थेट नदीच्या पात्रात सोडून दिले जात असल्याचं सांगितलं जात आहे. (uttar pradesh dead bodies in yamuna river corona shocking details found)

माणसं डोळ्यादेखत मरताहेत, आम्ही हतबल ठरतोय; भाजप आमदाराकडून योगी सरकारचे वाभाडे

यमुना नदीच्या प्रवाहात शुक्रवारी अनेक प्रेतं वाहून आल्याचं दिसलं आणि एकच गहजब उडाला. या घटनेची तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली. नदीच्या प्रवाहात वाहून आलेल्या प्रेतांच्या घटनेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी हमीरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा कळालं की गावागावांत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वांवर अंत्यसंस्कार करणं शक्य होत नसल्यानं प्रेतं नदीपात्रात सोडून दिली जात आहेत. 

कुवेतची भारताला मोठी मदत! २१५ टन ऑक्सिजन घेऊन तीन युद्धनौका रवाना, एकूण १४०० टन ऑक्सिजन भारतात येणार

हमीरपूरचे अप्पर पोलीस अधिक्षक अनुपकुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पोलीस अधिकारी जेव्हा घटनास्थळावर पोहोचले तेव्हा एका ट्रॅक्टरमधून दोन शव आणण्यात आले होते आणि ते यमुनेच्या प्रवाहात टाकण्यात आलं. पोलिसांच्या माहितीनुसार त्यांना आणखी काही मृतदेह नदी पात्रात सापडले आहेत. 

स्थानिक लहान मुलांनी दिली धक्कादायक माहितीकोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह नदीपात्रात सोडून देत जात असल्याच्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या काही लहानमुलांनी धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशाचप्रकारे एका ट्रॅक्टरवर टाकून आणलं जातं आणि नदी पात्रात टाकलं जातं. हमीरपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या यमुना नदीचा उत्तर बाजूचा काठ कानपूर जिल्ह्यात देखील येतो आणि दक्षिण बाजूचा काठ हमीरपूर जिल्ह्यात येतो. म्हणजेच यमुना नदी हमीरपूर आणि कानपूर जिल्ह्यांची सीमारेषेसारखी आहे. यमुना नदीला दोन्ही जिल्ह्यांतील लोक मोक्षदायिनी कालिंदीच्या नावानं ओळतात आणि मृतदेह नदीच्या पात्रात सोडण्याची जुनी परंपरा असल्याचंही सांगितलं जातं. त्यामुळे यमुनेच्या पात्रात एक-दोन शव दिसणं हे सामान्य मानलं जातं. पण कोरोना काळात नदीपात्रात वाहून येणाऱ्या मृतदेहांचा आकडा आता लक्षणीयरित्या वाढला आहे. यावरुनच ग्रामीण भागात होणाऱ्या मृत्यूंचा अंदाज लावता येऊ शकतो. 

उत्तर प्रदेशातील काही गावांमध्ये तर शेतीच्या जागांचंही स्मशानभूमीत रुपांतर झाल्याचंही सांगण्यात येतं. गावच्या स्मशानभूमीची जागा अपूरी पडू लागल्यामुळे शेतांमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. धक्कादायक बाब अशी की या मृतांचा आकडा सरकारकडे देखील नाही आणि याची कुठे अधिकृत नोंद केलेली आढळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागांमधील परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत जात आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश