शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

“संजय राऊत-उद्धव ठाकरेंनी आपला अमूल्य सल्ला तेव्हा का दिला नाही”; योगी आदित्यनाथ यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 10:50 IST

Yogi Adityanath Vs Thackeray Group: उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अयोध्येला आले होते, तेव्हा का बोलले नाहीत, अशी विचारणा करत योगी आदित्यनाथ यांनी ठाकरे गटावर टीका केली.

Yogi Adityanath Vs Thackeray Group: २२ तारखेला राम मंदिर रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. यासाठी प्राथमिक धार्मिक विधी, अनुष्ठान, पूजा-पाठ यांना सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील दिग्गज, मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राम मंदिरावरून राजकारणही अधिकच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राम मंदिराच्या जागेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विरोधकांच्या या टीकेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले आहे. 

भाजपावाल्यांनी राम मंदिराची जागा बदलली. रामललाची मूळ जन्मभूमी ही बाबरी मशीद परिसर आहे. मात्र, आताचे राम मंदिर हे मूळ जागी बांधले जात नाही, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह अन्य विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांच्या या आरोपाला योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा उल्लेख करत योगी आदित्यनाथ यांनी थेट विचारणा केली आहे. 

संजय राऊत-उद्धव ठाकरेंनी आपला अमूल्य सल्ला तेव्हा का दिला नाही

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, विरोधकांकडून केले जात असलेले दावे आणि आरोप चुकीचे आहेत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे स्वतः अयोध्येला दर्शनासाठी आले होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अयोध्येला आले होते, तेव्हा त्यांनी आपला अमूल्य सल्ला का दिला नाही, असा प्रतिप्रश्न योगी आदित्यनाथ यांनी केला. 

दरम्यान, अयोध्येनंतर आता काशी आणि मथुरा या ठिकाणी भाजपा आपले वचन पूर्ण करणार का, असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांना करण्यात आला होता. यावर बोलताना योगी आदित्यनाथ यांनी सविस्तर उत्तर दिले. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. राम मंदिरासाठी ५०० वर्ष संघर्ष केला आहे. संयमित पद्धतीने आम्ही न्यायालयीन लढाई लढून विजय मिळवला आणि त्यानंतरच आता रामलला प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. न्यायालयाच्या माध्यमातून अन्य ठिकाणचे मुद्देही सोडवले जातील. प्रभू श्रीकृष्णांची इच्छा असेल, तेव्हा तारखाही येतील आणि न्यायही मिळेल, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या