शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

'आपलं विखुरलेलं घर तर सांभाळता येईना...'; राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर मायावती स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 12:44 IST

"काँग्रेस सुरुवातीपासूनच घाणेरडे राजकारण करते. मी उत्तर दिले नाही, असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे, हे चुकीचे आहे. यात कसल्याही प्रकारचे तथ्य नाही."

उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी आणि बसपा नेत्या मायावती यांच्यात चांगलेच वाकयुद्ध सुरू झाल्याचे दिसत आहे. नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मायावतींवर निशाणा साधताना, त्यांनी तर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढलीच नाही, असे म्हटले होते. यावर आता मायावती यांनीही पलटवार करत, आपले विखुरलेले घर तर सांभाळता येईना अन् आमच्यासंदर्भात बोलत आहेत, असे म्हटले आहे.

यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना मायावती म्हणाल्या, काँग्रेस सुरुवातीपासूनच घाणेरडे राजकारण करते. मी उत्तर दिले नाही, असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे, हे चुकीचे आहे. यात कसल्याही प्रकारचे तथ्य नाही. खरे तर, काँग्रेसने इतर पक्षांची चिंता करण्यापेक्षा स्वतःची चिंता करावी, असा चिमटाही मायावती यांनी काढला.

आमच्या पक्षाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. खरे तर, निवडणुकीनंतर प्रत्येक विरोधी पक्षाने आलेल्या निकालांवर समीक्षा करायला हवी. मात्र, असे बोलू नये. काँग्रेसने बसपासंदर्भात काहीही बोलण्यापूर्वी 100 वेळा विचार करायला हवा. याच बरोबर, भाजपसोबत सामना करताना, आपली कामगिरी कशी राहिली, हेही काँग्रेसने बघायला हवे, असेही मायावती म्हणाल्या.

राहुल यांच्या वक्तव्यावर बोलताना मायावती म्हणाल्या, राजीव गांधी यांनीही बसपला बदनाम करण्यासाठी आणि कमकुवत करण्यासाठी कांशीराम यांना सीआयए एजंट म्हटले होते. आता त्यांचा मुलगाही त्यांच्याच मार्गावर चालत, असे आरोप करत आहे. खरे तर, काँग्रेसला भाजपच्या सेंट्रल एजन्सीची भीती वाटते. असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :mayawatiमायावतीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश