शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत, कॉम्प्रेसर थोडेच आहेत, जे थंड करतील", अखिलेश यादवांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 17:37 IST

UP Assembly Elections 2022 : अमृत अर्थसंकल्प असेल तर त्याआधी सगळे विषारी अर्थसंकल्प होते का? असा सवाल करत अखिलेश यादव यांनी भाजपावर टीका केली आहे. 

लखनऊ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे (UP Assembly Elections) वातावरण चांगलेच तापले आहे. समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांनी बुलंदशहरमध्ये आघाडीचा प्रचार केला. संयुक्त पत्रकार परिषदेत अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या 10 मार्चनंतर पूर्ण गर्मी शांत करू, या विधानावरून त्यांच्यावर निशाणा साधला. 

'योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत, कॉम्प्रेसर थोडेच आहेत, जे थंड करतील', असे म्हणत अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच, अखिलेश यादव म्हणाले की, प्रत्यक्षात भाजपाचा पराभव पाहून धक्का बसला आहे. याचबरोबर, बुलंदशहर घटना आणि हाथरसची घटना सरकारचे अपयश दर्शवते. तेथे कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या मुलीचे अंतिम संस्कार करण्याची संधी दिली गेली नाही. बुलंदशहर घटनेतील आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. याचे उत्तर सरकारने द्यावे, असे अखिलेश यादव म्हणाले. 

अखिलेश यादव यांनी बुलंदशहरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यात समाजवादी पार्टीचे सरकार आल्यास उत्तर प्रदेशात नोकरभरती सुरू केली जाईल. केंद्रीय अर्थसंकल्पातही आपली फसवणूक झाल्याचे आज देशातील शेतकरी दु:खी आहेत. कोणता अर्थसंकल्प आला आहे, हे गरिबांना कळतही नाही. सरकार याला अमृत अर्थसंकल्प म्हणत आहे. अमृत अर्थसंकल्प असेल तर त्याआधी सगळे विषारी अर्थसंकल्प होते का? असा सवाल करत अखिलेश यादव यांनी भाजपावर टीका केली आहे. 

10 मार्चनंतर पूर्ण गर्मी शांत करू - योगी आदित्यनाथदरम्यान, बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर थेट हल्ला चढवला होता. यावेळी त्यांनी सपा-आरएलडी आघाडीचे नाव न घेता त्यांचा उल्लेख सडलेला माल असा केला. एवढेच नाही, तर सरकारमध्ये येण्याचे त्यांचे स्वप्न 'कयामत'च्या दिवसापर्यंतही पूर्ण होणार नाही. 10 मार्चनंतर पूर्ण गर्मी शांत करू, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले होते. ते बुलंदशहर येथे निवडणूक प्रचार रॅलीला संबोधित करत होते.  

योगी आदित्यनाथ म्हणाले, हे लोक (एसपी-आरएलडी) पुन्हा नव्या कव्हरमध्ये आले आहेत. माल तोच आहे, कव्हर नवीन आहे. माल तोच सडलेला आहे, ज्यांनी असुरक्षितता, दंगली आणि माफिया दिले. ते आजही म्हणत आहेत, येऊ द्या सरकार. आम्ही म्हणालो, असे होणार नाही. 'कयामत'च्या दिवसापर्यंत तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाही. हे समजून घ्या. पण लक्षात असू द्या, 10 मार्चनंतर ही संपूर्ण गर्मी शांत करू.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Samajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा