नवी दिल्ली - मध्य पूर्वेतील युद्ध अद्याप सुरू आहे. अमेरिका-इस्रायलविरुद्ध इराण संघर्षाचा २४ वा दिवस असून स्ट्रेट होर्मुझमधील जल वाहतूक ठप्प झाल्याने जगात तेल, गॅस संकट वाढले आहे. जे देश ऊर्जा पुरवठ्यासाठी आयातीवर निर्भर आहेत त्यांना याचा जास्त फटका बसला आहे. मध्य पूर्वेतील तणावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आज संसदेत पंतप्रधानांनी सरकार या संकटांना तोंड देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगत प्लॅन बीही सांगितला.
मध्य पूर्वेतील संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक आहे. कच्चे तेल, आवश्यक गॅसचा बहुतांश पुरवठा याच मार्गाने येतो. परंतु युद्धामुळे स्ट्रेट होर्मुझमधून टँकर आणणे आव्हानात्मक बनले आहे. भारतात क्रूड, गॅसपासून खतांची आयातही याच देशातून होते. LPG ची ६० टक्के आयातही केली जाते. व्यावसायिक जहाजांवर हल्ला आणि होर्मुझमधील अडथळा मंजूर नाही. सरकार या मार्गावरून भारतीय जहाजांना सुरक्षितपणे वाहतूक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तिथल्या प्रत्येक परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. सरकार पूर्णत: सतर्क मोडला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मध्य पूर्वेतील संकटाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे आणि भारत आखाती देशांमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ऊर्जा हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि ऊर्जेचा एक प्रमुख जागतिक स्रोत असलेला पश्चिम आशिया सध्याच्या संकटामुळे प्रभावित झाला आहे. भारतावरील परिणाम कमी करण्यासाठी सरकार धोरणात्मक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
सरकारचा 'प्लॅन बी' ठरतोय यशस्वी
तेल आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत'प्लॅन बी' चा उल्लेख केला. जो भारतात पुरवठा सुनिश्चित करण्यास मदत करत आहे. आम्ही आमच्या आयातीमध्ये सातत्याने विविधता आणली आहे. पूर्वी भारत केवळ २७ देशांकडून ऊर्जा आयात करत असे, पण आता ही संख्या ४१ पर्यंत वाढली आहे. याशिवाय आमची रिफायनरी क्षमताही वाढली आहे. भारताकडे ५.३ दशलक्ष मेट्रिक टन कच्च्या तेलाचा साठा आहे. आमचे लक्ष्य ६.५ दशलक्ष मेट्रिक टन आहे. सर्व अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणारी जहाजे भारतात सुरक्षितपणे पोहोचतील याची खात्री करणे हा आमचा प्रयत्न आहे असं मोदींनी सांगितले.
दरम्यान, भारतात एलपीजीचे उत्पादन सातत्याने वाढवले जात आहे. गेल्या दशकात इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यात आले आहे. परिणामी पेट्रोलची खरेदी कमी झाली आहे. देशात सध्या ५३ लाख मेट्रिक टन पेट्रोलियम उपलब्ध आहे. आम्ही पर्यायी इंधन पर्यायांच्या दिशेने पावले उचलली आहेत ज्यामुळे भारताचे भविष्य सुरक्षित होईल असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी सध्याच्या संकटाचा हवाला देत व्यक्त केला.
Web Summary : Amid Middle East tensions disrupting energy supplies, PM Modi highlighted India's diversified import strategy and increased refinery capacity. The nation has expanded its energy import sources and boosted LPG production to mitigate global economic impacts, ensuring a secure energy future.
Web Summary : मध्य पूर्व तनाव से ऊर्जा आपूर्ति बाधित होने के बीच, पीएम मोदी ने भारत की विविध आयात रणनीति और बढ़ी हुई रिफाइनरी क्षमता पर प्रकाश डाला। राष्ट्र ने वैश्विक आर्थिक प्रभावों को कम करने, और एक सुरक्षित ऊर्जा भविष्य सुनिश्चित करने के लिए अपने ऊर्जा आयात स्रोतों का विस्तार किया है और एलपीजी उत्पादन को बढ़ावा दिया है।