शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 16:07 IST

IPS Bajrang Prasad Yadav : बजरंग प्रसाद यादव यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. २०१४ मध्ये जेव्हा ते दहावीत होते, तेव्हा काही लोकांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली.

वडिलांच्या हत्येनंतरही मुलाने खचून न जाता आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी यूपीएससी उत्तीर्ण करण्याचा मोठा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशच्या बजरंग प्रसाद यादव यांची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे.  आयुष्यात अनेक संकटं, आव्हानं, बिकट परिस्थितीचा सामना करत त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत अव्वल स्थान मिळवलं. बजरंग यांच्या वडिलांचं स्वप्न होतं की,  त्यांचा मुलगा अधिकारी व्हावा. आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी बजरंग यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस होण्याचा निर्णय घेतला.

उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील रहिवासी बजरंग प्रसाद यादव यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. २०१४ मध्ये जेव्हा ते दहावीत होते, तेव्हा काही लोकांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली. वडिलांच्या हत्येने ते पूर्णपणे हादरले होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही खूप वाईट होती. दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती, पण बजरंग प्रसाद यांनी हार मानली नाही. 

 फी भरण्यासाठी विकलं धान्य

कठीण काळातही जिद्द सोडली नाही आणि आपला अभ्यास सुरू ठेवला. आर्थिक अडचणींमुळे, त्यांनी ट्यूशन फी भरण्यासाठी घरातील धान्यही विकलं. अनेक अडचणी असूनही, बजरंग यांनी कधीच आपलं शिक्षण सोडलं नाही. ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये ते अपयशी ठरले, पण कठोर परिश्रम करत राहिले. 

यूपीएससी परीक्षेत ४५४ वा रँक 

सततच्या कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाचे फळ म्हणजे २०२२ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षेत ४५४ वा रँक मिळवला. हे यश त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. यासोबतच बजरंग प्रसाद यादव यांचं यश लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे जे जीवनातील कठीण परिस्थितींना तोंड देत आपलं ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत करतात. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीUttar Pradeshउत्तर प्रदेश