शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

UPSC Success Story: रेल्वे अपघातात हात-पाय गमावले, तरीही हार मानली नाही; पहिल्याच प्रयत्नात झाला IAS अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 15:34 IST

UPSC च्या मुलाखतीत दिले असे उत्तर, पॅनलमधील सर्वांनीच केले जोरदार कौतुक.

नवी दिल्ली: 'कोशिश करने वालों की हार नहीं होती...' हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळी यूपीएससी(UPSC) परीक्षेत तंतोतंत खऱ्या ठरतात. काही दिवसांपूर्वीच UPSC 2022 चा निकाल लागला आणि या निकालात मैनपुरी येथील रहिवासी असलेल्या सुरज तिवारीने या ओळी खऱ्या ठरवल्या आहेत.

रेल्वे अपघातात दोन्ही पाय आणि एक हात गमावलेल्या सूरजने यूपीएससी परीक्षेत 917 वा क्रमांक पटकावला आहे. या यशानंतर सर्वच स्तरातून सुरजचे कौतुक होत आहे. सुरजचे यश सर्वांना दिसले, पण त्यामागची त्याची मेहनत फार थोड्या लोकांना माहिती आहे. त्याच्या संघर्षाची कहाणी खरंच इतरांना प्रेरणा देऊन जाते.

दरम्यान, सुरज तिवारीने त्याच्या युपीएससी परीक्षेच्या मुलाखतीत घडलेला एक किस्सा सांगितला. यावेळी अधिकाऱ्याने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सुरजने सर्वांनाच चकीत केले. अधिकाऱ्याने प्रश्न विचारला की, तुम्ही स्पेशल कॅटेगरीतून येता. तुमची निवड झाल्यावर, तुमच्या कॅटेगरीतील लोकांसाठी कोणत्या योजना राबवाल?

या प्रश्नाला उत्तर देताना सुरज म्हणाला की, माफ करा सर, मी कोणत्याही स्पेशल कॅटेगरीतून आलेलो नाही. मी तुमच्याप्रमाणे सर्व काही करण्यास सक्षम आहे. यावेळी सुरजचे उत्तर ऐकून पॅनेलमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांनी त्याचे जोरदार कौतुक केले.

रेल्वे अपघातात पाय गमावले24 जानेवारी 2017 रोजी दादरी-गाझियाबाद येथे झालेल्या रेल्वे अपघातात सुरजने त्याचे दोन्ही पाय, उजव्या आणि डाव्या हाताची बोटे गमावली होती. यानंतर तो चार महिने रुग्णालयात राहिले, त्यानंतर तीन महिने घरीच विश्रांती घेतली. यानंतरही सुरजने हार मानली नाही. अपघातानंतर 2018 मध्ये त्याने जेएनयू दिल्लीत बीएमध्ये नव्याने प्रवेश घेतला. तेथून 2021 साली बीए पास करून एमएला प्रवेश घेतला. लहानपणापासूनच हुशार सूरज तिवारी अभ्यासासोबत यूपीएससीची तयारी करत राहिला. अखेर त्याला यश मिळाले.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगEducationशिक्षणInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी