शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

UPSC Success Story: रेल्वे अपघातात हात-पाय गमावले, तरीही हार मानली नाही; पहिल्याच प्रयत्नात झाला IAS अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 15:34 IST

UPSC च्या मुलाखतीत दिले असे उत्तर, पॅनलमधील सर्वांनीच केले जोरदार कौतुक.

नवी दिल्ली: 'कोशिश करने वालों की हार नहीं होती...' हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळी यूपीएससी(UPSC) परीक्षेत तंतोतंत खऱ्या ठरतात. काही दिवसांपूर्वीच UPSC 2022 चा निकाल लागला आणि या निकालात मैनपुरी येथील रहिवासी असलेल्या सुरज तिवारीने या ओळी खऱ्या ठरवल्या आहेत.

रेल्वे अपघातात दोन्ही पाय आणि एक हात गमावलेल्या सूरजने यूपीएससी परीक्षेत 917 वा क्रमांक पटकावला आहे. या यशानंतर सर्वच स्तरातून सुरजचे कौतुक होत आहे. सुरजचे यश सर्वांना दिसले, पण त्यामागची त्याची मेहनत फार थोड्या लोकांना माहिती आहे. त्याच्या संघर्षाची कहाणी खरंच इतरांना प्रेरणा देऊन जाते.

दरम्यान, सुरज तिवारीने त्याच्या युपीएससी परीक्षेच्या मुलाखतीत घडलेला एक किस्सा सांगितला. यावेळी अधिकाऱ्याने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सुरजने सर्वांनाच चकीत केले. अधिकाऱ्याने प्रश्न विचारला की, तुम्ही स्पेशल कॅटेगरीतून येता. तुमची निवड झाल्यावर, तुमच्या कॅटेगरीतील लोकांसाठी कोणत्या योजना राबवाल?

या प्रश्नाला उत्तर देताना सुरज म्हणाला की, माफ करा सर, मी कोणत्याही स्पेशल कॅटेगरीतून आलेलो नाही. मी तुमच्याप्रमाणे सर्व काही करण्यास सक्षम आहे. यावेळी सुरजचे उत्तर ऐकून पॅनेलमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांनी त्याचे जोरदार कौतुक केले.

रेल्वे अपघातात पाय गमावले24 जानेवारी 2017 रोजी दादरी-गाझियाबाद येथे झालेल्या रेल्वे अपघातात सुरजने त्याचे दोन्ही पाय, उजव्या आणि डाव्या हाताची बोटे गमावली होती. यानंतर तो चार महिने रुग्णालयात राहिले, त्यानंतर तीन महिने घरीच विश्रांती घेतली. यानंतरही सुरजने हार मानली नाही. अपघातानंतर 2018 मध्ये त्याने जेएनयू दिल्लीत बीएमध्ये नव्याने प्रवेश घेतला. तेथून 2021 साली बीए पास करून एमएला प्रवेश घेतला. लहानपणापासूनच हुशार सूरज तिवारी अभ्यासासोबत यूपीएससीची तयारी करत राहिला. अखेर त्याला यश मिळाले.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगEducationशिक्षणInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी