शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत उपेंद्र कुशवाह यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 15:02 IST

बिहारमधील एनडीएच्या जागावाटपावरून दीर्घकाळापासून नाराज असतेल्या उपेंद्र कुशवाह यांनी अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत आपल्या पदाचा राजीनामा दिला.

ठळक मुद्देबिहारमधील एनडीएच्या जागावाटपावरून दीर्घकाळापासून नाराज असतेल्या उपेंद्र कुशवाह यांनी अखेर आज आपल्या पदाचा राजीनामा दिला राज्यातील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, मला आणि माझ्या पक्षाला संपवणे हाच त्यांच्या अजेंडा आहे

नवी दिल्ली -  बिहारमधील एनडीएच्या जागावाटपावरून दीर्घकाळापासून नाराज असतेल्या उपेंद्र कुशवाह यांनी अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत आपल्या पदाचा राजीनामा दिला. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमधील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले आहेत. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबत काहीही काम झालेले नाही. बिहार जिखे होते तिथेच आजही आहे, अशी टीका कुशवाहा यांनी केली.'' कुशवाह हे मोदी सरकारमध्ये मनुष्यबळ विकास राज्यमंत्रिपदाचा कारभार सांभाळत होते. यावेळी एनडीएमध्ये होत असलेली आपली घुसमटही स्पष्टपणे बोलून दाखवली. ''एनडीएमधील माझा अनुभव अत्यंत वाईट आहे. बिहारमधील जनतेला न्याय मिळावा यासाठी मी एनडीएच्या बैठकीत माझे मत वारंवार मांडले. मात्र नितीश कुमार बिहारी जनतेला न्याय देण्याचे काम करत आहेत, असे भाजपाकडून सांगण्यात येत होते.'' असे कुशवाह म्हणाले. तसेच राज्यातील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, मला आणि माझ्या पक्षाला संपवणे हाच त्यांच्या अजेंडा आहे, तसेच हे काम भाजपाने सुरू केले आहे. असा आरोप कुशवाह यांनी केला.  

आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या आरएलएसपी या पक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी कुशवाहा यांनी केली होती. मात्र भाजपाकडून त्या मागणीकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे कुशवाहा गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. दरम्यान, उपेंद्र कुशवाहा हे एनडीएला सोडचिठ्ठी देऊन विरोधी पक्षांच्या आज होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, उपेंद्र कुशवाहा हे आपला राष्ट्रीय लोक समता पार्टी (आरएलएसपी) हा पक्ष शरद यादव यांच्या लोकतांत्रिक जनता दल या या पक्षाल विलीन करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे कुशवाहा यांच्या पक्षातील अनेक नेते जेडीयूच्या संपर्कात असल्याचेही वृत्त आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBiharबिहारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी