शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 16:37 IST

पावसामुळे अनेक गावांतील वीज खंडित झाली असून दहाहून अधिक घरांची पडझड झाल्याची माहिती मिळत आहे. हवामान खात्याने शनिवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

उत्तर प्रदेशात पावसाचा कहर पाहायला आहे. गेल्या ४८ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये अपघात होऊन आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पावसामुळे अनेक गावांतील वीज खंडित झाली असून दहाहून अधिक घरांची पडझड झाल्याची माहिती मिळत आहे. हवामान खात्याने शनिवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

उत्तर प्रदेशातील ५८ हून अधिक जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. तर सुलतानपूरच्या लांबुओ येथे सर्वाधिक २७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावेळी वीज पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला. तसेच सीतापूरमधील ३०० हून अधिक गावांतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. गवाहिया गावात घराची भिंत कोसळून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.

पावसाने केला कहर 

अयोध्येतील परिस्थितीही अत्यंत वाईट होती, या हंगामातील सर्वाधिक १२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. येथे घराचे छत कोसळले असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. ललितपूर आणि फतेहपूरमध्येही वीज पडून एक मुलगी आणि एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. आंबेडकरनगरमध्ये वीज पडल्याने चार बहिणींचा मृत्यू झाला.

शाळेचा परिसर जलमय

उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. आंबेडकरनगर येथील कस्तुरबा गांधी शाळेचा परिसर जलमय झाला होता. अनेक शासकीय कार्यालये आणि रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

३० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

आजही हवामान खात्याने राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या काळात जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात नागरिकांना घरातमध्येच राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशRainपाऊस