शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 16:37 IST

पावसामुळे अनेक गावांतील वीज खंडित झाली असून दहाहून अधिक घरांची पडझड झाल्याची माहिती मिळत आहे. हवामान खात्याने शनिवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

उत्तर प्रदेशात पावसाचा कहर पाहायला आहे. गेल्या ४८ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये अपघात होऊन आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पावसामुळे अनेक गावांतील वीज खंडित झाली असून दहाहून अधिक घरांची पडझड झाल्याची माहिती मिळत आहे. हवामान खात्याने शनिवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

उत्तर प्रदेशातील ५८ हून अधिक जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. तर सुलतानपूरच्या लांबुओ येथे सर्वाधिक २७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावेळी वीज पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला. तसेच सीतापूरमधील ३०० हून अधिक गावांतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. गवाहिया गावात घराची भिंत कोसळून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.

पावसाने केला कहर 

अयोध्येतील परिस्थितीही अत्यंत वाईट होती, या हंगामातील सर्वाधिक १२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. येथे घराचे छत कोसळले असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. ललितपूर आणि फतेहपूरमध्येही वीज पडून एक मुलगी आणि एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. आंबेडकरनगरमध्ये वीज पडल्याने चार बहिणींचा मृत्यू झाला.

शाळेचा परिसर जलमय

उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. आंबेडकरनगर येथील कस्तुरबा गांधी शाळेचा परिसर जलमय झाला होता. अनेक शासकीय कार्यालये आणि रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

३० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

आजही हवामान खात्याने राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या काळात जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात नागरिकांना घरातमध्येच राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशRainपाऊस