शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

उत्तर प्रदेशात जाट नेते-भाजप चर्चा; बाजी पलटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 06:33 IST

विधानसभा निवडणुकीत जाट समुदायाने भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली होती. एवढेच नव्हे, तर या भागातील ७६ पैकी ६६ जागा भाजपला मिळाल्या होत्या. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :   प्रजासत्ताकदिनी सायंकाळी भाजप खासदार प्रवेश सिंह वर्मा यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाट समुदायाच्या नेत्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यामुळे  हा समुदाय भाजपला पुन्हा पाठिंबा देईल का? २०१७ च्या निवडणुकीआधीही अमित शहा हे जाट समुदायाच्या नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले होते. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जाट समुदायाने भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली होती. एवढेच नव्हे, तर या भागातील ७६ पैकी ६६ जागा भाजपला मिळाल्या होत्या. 

त्यावेळी २०१२ मधील दंगलीमुळे  जाट आणि मुुस्लिम समुदायांदरम्यान दरी पडली होती. तीन कृषी कायदेही मंजूर करण्यात आलेले नव्हते.  कृषी कायद्याला विरोध करणारे राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांच्यासह हजारो शेतकऱ्यांवर लाठीमारही करण्यात आलेला नव्हता.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणाऱ्या जाट समुदायाच्या नेत्यांत  भाजपचे कार्यकर्ते होते. केंद्रीय मंत्री संजीव बालियान आणि खासदार प्रवेश वर्मा यांच्याव्यतिरिक्त भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस कृष्णपाल सिंह, डाॅ. अतुल तेवतिया, अतुल चौधरी, मनोज चौधरी, भाजप किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सोमपाल चौधरी, रवींद्र राजौरा यांच्यासह जवळपास १५० कार्यकर्त्यांचा यात समावेश होता. 

समाजवादी पार्टी-रालोदवरही नाराजीकिसान शक्ती संघाचे प्रमुख आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट समुदायाचे नेते चौधरी पुष्पेंद्र सिंह यांचे असे मत आहे की, ३० ते ४० टक्के जाट समुदाय आजही भाजपच्या बाजूने आहे. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे जयंत चौधरी आणि अखिलेश यादव यांची निष्क्रियता होय. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहUttar Pradeshउत्तर प्रदेशUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२