शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता, एक दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 14:25 IST

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी एससी-एसटी कोर्टाने आज निकाल दिला. न्यायालयाने चारपैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी एससी-एसटी कोर्टाने आज निकाल दिला. न्यायालयाने चारपैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तर एका आरोपीला शिक्षा दिली आहे. १४ सप्टेंबर २०२० रोजी हातरसमध्ये एका दलित मुलीवर काही तरुणांनी सामूहिक बलात्कार केला होता. यानंतर त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. २९ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला होता.

एससी-एसटी कोर्टाने लव-कुश, रामू आणि रवी या तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. संदीप या आरोपीला न्यायालयाने ३/११० आणि ३०४ नुसार दोषी ठरवले आहे. कोर्ट २ वाजता दोषींना शिक्षा सुनावणार आहे. मात्र, पीडित पक्ष या निकालावर असमाधानी असल्याचे दिसून आले. या निर्णयाविरोधात पीडित पक्ष उच्च न्यायालयात जाणार आहे.

त्रिपुरात भाजपला 'अच्छे दिन'; निवडणूक निकालात आघाडी, पहिला कौल आला

पीडितेने उपचारादरम्यान दिलेल्या जबाबात संदीप, रामू, लवकुश आणि रवी या चार तरुणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला होता. त्याआधारे पोलिसांनी चार तरुणांना अटक केली होती. या प्रकरणी यूपी पोलिसांवर सर्व प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले होते. पोलिसांनी कुटुंबीयांना न सांगता मुलीवर अंत्यसंस्कार केल्याचा आरोप करण्यात आला. एवढेच नाही तर यूपी पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे पीडितेवर सामूहिक बलात्कार झाला नसल्याचा दावा केला होता. यूपी पोलिसांच्या या दाव्यावर कोर्टाने यूपी पोलिसांना फटकारले. योगी सरकारने याप्रकरणी एसआयटीही स्थापन केली होती.

मात्र, या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी योगी सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केली होती, त्यानंतर सीबीआयने तपास हाती घेतला आणि पीडितेच्या कुटुंबीयांची अनेकदा चौकशी केली. सीबीआयने अलीगड तुरुंगात बंद असलेल्या चारही आरोपींची चौकशी केली होती. आरोपींची पॉलीग्राफी चाचणी आणि ब्रेन मॅपिंगही करण्यात आले. नुकतेच सीबीआयने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. सीबीआयने २२ सप्टेंबर रोजी दिलेल्या पीडितेच्या शेवटच्या जबानीच्या आधारे आरोपपत्र दाखल केले आणि निर्णय कोर्टावर सोडला. सीबीआयने हातरस प्रकरणाशी संबंधित ४ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. एजन्सीने चार आरोपींविरुद्ध हत्या, सामूहिक बलात्कार आणि एससी-एसटी कायद्याच्या कलमांतर्गत आरोपपत्र दाखल केले होते. कलम ३२५, एससी-एसटी कायदा ३७६ ए आणि ३७६ डी आणि ३०२ अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCourtन्यायालयPoliceपोलिस