शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

Uttar Pradesh Election Results 2022: प्रेमात आलं 'राजकारण', नवरा आमदार झाला; बायकोनं घटस्फोटासाठी अर्ज दिला, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 15:14 IST

स्वाती सिंह यांनी बलियातून भाजपा आमदार झालेले दयाशंकर सिंह यांच्यासोबत घटस्फोट घेण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

लखनौ – अलीकडेच उत्तर प्रदेशसह ५ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपाने ४ राज्यात सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. या निवडणूक निकालाच्या वेगवेगळ्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. परंतु आता उत्तर प्रदेशातील निवडणुकीमुळे एक कुटुंब विभक्त झाल्याचं समोर आलं आहे. गृहिणी ते आमदार आणि योगी सरकारच्या पहिल्या कारकिर्दीत मंत्री बनण्याचा प्रवास करणाऱ्या स्वाती सिंह पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

स्वाती सिंह यांनी बलियातून भाजपा आमदार झालेले दयाशंकर सिंह यांच्यासोबत घटस्फोट घेण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. दयाशंकर सिंह यांच्याविरोधात स्वाती सिंह यांनी घटस्फोटाचा खटला पुन्हा सुरू करावा अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. एकेकाळी स्वाती सिंह त्यांच्या कुटुंबासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या आणि पती दयाशंकर सिंह यांच्यासाठी राजकीय ढाल बनल्या होत्या. परंतु आता स्वाती सिंह यांनी पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी स्वाती सिंह यांनी १० वर्षापूर्वी कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याची पुन्हा सुनावणी करण्याची विनंती कोर्टाला केली आहे. स्वाती सिंह या आमदार आणि मंत्री बनण्याच्या आधीपासून दयाशंकर सिंह यांच्यासोबत नात्यात दुरावा आला आहे. स्वाती सिंह आणि दयाशंकर सिंह यांच्यात २००८ पासून भांडणं सुरू झाली. हे प्रकरण कोर्टात पोहचले. दयाशंकर सिंह यांच्याशी घटस्फोट घेण्यासाठी लखनौ कौटुंबिक न्यायालयात २०१२ मध्ये स्वाती सिंह यांनी खटला दाखल केला. कोर्टाने दयाशंकर सिंह यांना त्यांचे म्हणणं मांडण्यासाठी नोटीस जारी केली होती. त्यावेळी दयाशंकर सिंह यांनी बसपा प्रमुख मायावतींबाबत वादग्रस्त विधान केले. त्यामुळे भाजपा बॅकफूटवर गेली. त्यांना पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित केले. मात्र बसपा नेत्यांनी दयाशंकर यांची पत्नी स्वाती सिंह आणि मुलीबाबत अश्लिल विधाने केली. त्यामुळे स्वाती सिंह यांनी बसपाविरोधात मोर्चा उघडला. त्यांचा आक्रमक पवित्रा भाजपा हायकमांडला दिसला.

स्वाती सिंह यांनी बचाव मुलीचा केला परंतु दयाशंकर सिंह यांच्यासाठी राजकीय ढाल बनल्या. स्वाती सिंह यांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना भाजपा महिला मोर्चाचं अध्यक्षपद मिळालं. त्यानंतर लखनौच्या सरोजनीनगर जागेवरून उमेदवारी मिळाली. ज्याठिकाणी भाजपा ३ दशकांपासून विजयाची वाट पाहत होती. त्या सरोजनीनगर जागेवर सहानुभूती आणि मोदी लाटेमुळे स्वाती सिंह निवडून आल्या. त्यानंतर योगींच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले. २०१७ मध्ये मंत्री बनल्यानंतर स्वाती सिंह यांनी दयाशंकर सिंह यांच्यासोबत घटस्फोट घेण्याच्या याचिकेवर पुढे काहीच केले नाही. २०१८ मध्य कोर्टाने दोन्ही पक्ष कोर्टात येत नसल्याने केस बंद केली. आता कोर्टाचे हे आदेश परत घेण्यासाठी स्वाती सिंह यांनी याचिका केली आहे.

२०२२ च्या निवडणुकीत पुन्हा पती-पत्नी आमनेसामने    

स्वाती सिंह आणि दयाशंकर सिंह यांच्या नात्यात दुरावा होता. २०१७ नंतर हा दुरावा कमी झाला. स्वाती सिंह मंत्रिपदात रमल्या तर दयाशंकर सिंह पक्षाच्या कामात व्यस्त झाले. परंतु २०२२ निवडणूक आल्यानंतर पुन्हा दोघं समोरासमोर आले. स्वाती-दयाशंकर यांच्यात झटापट झाली. दोघांनीही सरोजनीनगर जागेवर दावा सांगितला. अशावेळी भाजपानं स्वाती सिंह ऐवजी राजेश्वर सिंह यांना उमेदवारी दिली. तर दयाशंकर सिंह यांना बलिया येथून निवडणूक लढवण्यास सांगितले. दयाशंकर सिंह विजयी झाले आणि आता मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२