शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Uttar Pradesh Election Results 2022: प्रेमात आलं 'राजकारण', नवरा आमदार झाला; बायकोनं घटस्फोटासाठी अर्ज दिला, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 15:14 IST

स्वाती सिंह यांनी बलियातून भाजपा आमदार झालेले दयाशंकर सिंह यांच्यासोबत घटस्फोट घेण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

लखनौ – अलीकडेच उत्तर प्रदेशसह ५ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपाने ४ राज्यात सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. या निवडणूक निकालाच्या वेगवेगळ्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. परंतु आता उत्तर प्रदेशातील निवडणुकीमुळे एक कुटुंब विभक्त झाल्याचं समोर आलं आहे. गृहिणी ते आमदार आणि योगी सरकारच्या पहिल्या कारकिर्दीत मंत्री बनण्याचा प्रवास करणाऱ्या स्वाती सिंह पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

स्वाती सिंह यांनी बलियातून भाजपा आमदार झालेले दयाशंकर सिंह यांच्यासोबत घटस्फोट घेण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. दयाशंकर सिंह यांच्याविरोधात स्वाती सिंह यांनी घटस्फोटाचा खटला पुन्हा सुरू करावा अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. एकेकाळी स्वाती सिंह त्यांच्या कुटुंबासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या आणि पती दयाशंकर सिंह यांच्यासाठी राजकीय ढाल बनल्या होत्या. परंतु आता स्वाती सिंह यांनी पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी स्वाती सिंह यांनी १० वर्षापूर्वी कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याची पुन्हा सुनावणी करण्याची विनंती कोर्टाला केली आहे. स्वाती सिंह या आमदार आणि मंत्री बनण्याच्या आधीपासून दयाशंकर सिंह यांच्यासोबत नात्यात दुरावा आला आहे. स्वाती सिंह आणि दयाशंकर सिंह यांच्यात २००८ पासून भांडणं सुरू झाली. हे प्रकरण कोर्टात पोहचले. दयाशंकर सिंह यांच्याशी घटस्फोट घेण्यासाठी लखनौ कौटुंबिक न्यायालयात २०१२ मध्ये स्वाती सिंह यांनी खटला दाखल केला. कोर्टाने दयाशंकर सिंह यांना त्यांचे म्हणणं मांडण्यासाठी नोटीस जारी केली होती. त्यावेळी दयाशंकर सिंह यांनी बसपा प्रमुख मायावतींबाबत वादग्रस्त विधान केले. त्यामुळे भाजपा बॅकफूटवर गेली. त्यांना पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित केले. मात्र बसपा नेत्यांनी दयाशंकर यांची पत्नी स्वाती सिंह आणि मुलीबाबत अश्लिल विधाने केली. त्यामुळे स्वाती सिंह यांनी बसपाविरोधात मोर्चा उघडला. त्यांचा आक्रमक पवित्रा भाजपा हायकमांडला दिसला.

स्वाती सिंह यांनी बचाव मुलीचा केला परंतु दयाशंकर सिंह यांच्यासाठी राजकीय ढाल बनल्या. स्वाती सिंह यांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना भाजपा महिला मोर्चाचं अध्यक्षपद मिळालं. त्यानंतर लखनौच्या सरोजनीनगर जागेवरून उमेदवारी मिळाली. ज्याठिकाणी भाजपा ३ दशकांपासून विजयाची वाट पाहत होती. त्या सरोजनीनगर जागेवर सहानुभूती आणि मोदी लाटेमुळे स्वाती सिंह निवडून आल्या. त्यानंतर योगींच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले. २०१७ मध्ये मंत्री बनल्यानंतर स्वाती सिंह यांनी दयाशंकर सिंह यांच्यासोबत घटस्फोट घेण्याच्या याचिकेवर पुढे काहीच केले नाही. २०१८ मध्य कोर्टाने दोन्ही पक्ष कोर्टात येत नसल्याने केस बंद केली. आता कोर्टाचे हे आदेश परत घेण्यासाठी स्वाती सिंह यांनी याचिका केली आहे.

२०२२ च्या निवडणुकीत पुन्हा पती-पत्नी आमनेसामने    

स्वाती सिंह आणि दयाशंकर सिंह यांच्या नात्यात दुरावा होता. २०१७ नंतर हा दुरावा कमी झाला. स्वाती सिंह मंत्रिपदात रमल्या तर दयाशंकर सिंह पक्षाच्या कामात व्यस्त झाले. परंतु २०२२ निवडणूक आल्यानंतर पुन्हा दोघं समोरासमोर आले. स्वाती-दयाशंकर यांच्यात झटापट झाली. दोघांनीही सरोजनीनगर जागेवर दावा सांगितला. अशावेळी भाजपानं स्वाती सिंह ऐवजी राजेश्वर सिंह यांना उमेदवारी दिली. तर दयाशंकर सिंह यांना बलिया येथून निवडणूक लढवण्यास सांगितले. दयाशंकर सिंह विजयी झाले आणि आता मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२