शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

“जर त्यांनी सावरकरांचं ऐकलं असतं तर देशाची फाळणी झाली नसती,” योगी आदित्यनाथांचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 10:08 AM

अटल बिहारी वाजपेयी सरकारनं पोर्टब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये सावरकरांची प्रतिमा लावली होती, परंतु काँग्रेसनं ती हटवली, योगी आदित्यनाथांचा दावा.

“विनायक दामोदर सावरक यांच्यासारख्या क्रांतिकारक, लेखक, तत्त्वज्ञ, कवीचा अपमान करण्यात काँग्रेसनं कोणतीही कसर सोडली नाही,” असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी केला. "स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने राष्ट्रनायक सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सावरकरांहून मोठे कोणीही नव्हते. स्वातंत्र्यानंतर सावरकरांना जो सन्मान मिळायला हवा होता तो दिला गेला नाही,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले. हिंदुत्व हा शब्द वीर सावरकर यांनीच दिल्याचंही त्यांनी नमूद केलं.

सावरकरांच्या जयंतीनिमित्त उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी प्रकाशित केलेल्या 'वीर सावरकर - जे भारताची फाळणी रोखू शकले असते आणि त्यांचा राष्ट्रीय सुरक्षा दृष्टीकोन' या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केले. “जर काँग्रेसनं सावरकरांचं म्हणणं ऐकलं तर देशाची फाळणी झाली नसती. पाकिस्तान जाईल येईल पण भारत कायम राहिलअसं सावरकर म्हणाले होते,” असंही त्यांनी नमूद केलं.

“प्रत्येक नागरिकाला अल्पसंख्याक बहुसंख्याकच्या दृष्टीकोनातून पाहण्यापेक्षा त्यांना नागरिकांच्या रुपात पाहिलं पाहेज. आम्ही उत्तर प्रदेशात हे लागू केलं आणि रस्त्यावर ना नमाज पठण होणार ना पूजा होणार हे पाहिलं,” असं योगी म्हणाले. अटल बिहारी वाजपेयी सरकारनं पोर्टब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांची प्रतिमा लावली होती, परंतु नंतर काँग्रेसनं ती हटवल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरcongressकाँग्रेस