शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांची बस नदीत कोसळली; १४ जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील लोकांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 14:13 IST

नेपाळमध्ये ४० भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nepal Bus Accident : नेपाळमध्ये शुक्रवारी मोठा बस अपघात झाला. नेपाळमध्ये ४० भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली. उत्तर प्रदेशातील ही बस पोखराहून काठमांडूला जात होती. या भीषण दुर्घटनेत १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथली नोंदणीकृत बस येथून प्रवाशांना घेऊन नेपाळकडे निघाली होती. बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

नेपाळच्या तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात उत्तर प्रदेशातील बस मर्स्यांगडी नदीत कोसळून अपघात झाला. नेपाळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. जिल्हा पोलीस कार्यालय तनहुचे डीएसपी दीपकुमार राय यांनी म्हटलं की, उत्तर प्रदेश एफटी ७६२३ क्रमांकाची बस नदीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये तब्बल ४० प्रवासी होती आणि त्यातील १४ जणांचा मृत्यू झाला. 

नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलासह नेपाळ आपत्ती व्यवस्थापनाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) माधव पौडेल यांच्या नेतृत्वाखाली ४५ पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकासह अपघातस्थळी बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय प्रवासी पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये थांबले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पोखराहून काठमांडूसाठी निघालेल्या बसचा अपघात झाला.

नेपाळच्या सशस्त्र पोलिसांचे सहायक प्रवक्ते शैलेंद्र थापा यांनी सांगितले की, घटनास्थळावरून १४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. १६ जखमींना वाचवण्यात आले असून त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे बस ज्या नदीत पडली त्या नदीलाही तडाखा बसला आहे. बसमध्ये ४० जण होते, त्यापैकी काहींना वाचवण्यात यश आले आहे.

टॅग्स :NepalनेपाळUttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात