शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
3
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
4
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
5
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
6
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
7
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
8
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
9
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
10
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
11
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
12
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
13
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
14
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
16
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
17
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
18
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
19
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
20
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
Daily Top 2Weekly Top 5

छातीत दुखतंय, श्वास घेण्यास त्रास अन् ताप…; रुग्णालयात रुग्णांच्या रांगा, 4 दिवसांत 57 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 11:12 IST

उपचारासाठी येणाऱ्या बहुतेक रुग्णांनी प्रथम छातीत दुखणे, श्वासोच्छवासाचा त्रास आणि नंतर ताप आल्याची तक्रार केली.

उत्तर प्रदेशातील बलियामध्ये उष्णतेने कहर सुरूच आहे. येथे उष्णतेच्या लाटेने गेल्या चार दिवसांत 57 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, उष्माघाताने दोनच जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. उर्वरित अहवाल तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. मृत्यूचं नेमकं कारण काय? हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, उपचारासाठी येणारे बहुतेक रुग्ण प्रथम छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार करतात. यानंतर ताप येतो.

लखनौचे आरोग्य संचालक डॉ. एके. सिंह यांनी वाढत्या उष्णतेमुळे रुग्णांच्या मृत्यूच्या वाढत्या संख्येवर सांगितले की, उपचारासाठी येणाऱ्या बहुतेक रुग्णांनी प्रथम छातीत दुखणे, श्वासोच्छवासाचा त्रास आणि नंतर ताप आल्याची तक्रार केली. आम्ही यूरीन टेस्ट, ब्लड टेस्ट आणि अन्य टेस्ट घेत आहोत. बाकीचे रुग्ण घाबरून रुग्णालयात पोहोचले. इतर दाखल झालेल्या रुग्णांमध्ये अशा लोकांचाही समावेश होतो ज्यांना आधीच आजार झाला होता. आम्ही नमुने घेत आहोत, त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल.

दुसरीकडे लखनऊहून आरोग्य विभागाचे एक पथकही रुग्णांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी बलिया येथे पोहोचले आहे. रविवारी बलिया जिल्हा रुग्णालयातील वॉर्डांची तपासणी करणारे संचालक (संसर्गजन्य रोग) डॉ. एके. सिंह आणि संचालक केएन तिवारी यांनी उष्णतेमुळे मृत्यू होण्याची शक्यता नाकारली.

रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर डॉ. ए.के. सिंग म्हणाले की, मृत्यूची संख्या चिंताजनक आहे, परंतु बहुतांश घटनांमध्ये रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांतच मृत्यू झाले आहेत. सिंह म्हणाले की, बहुतेक प्रकरणांमध्ये, प्रवेशानंतर दोन ते सहा तासांच्या दरम्यान मृत्यू झाला. आमच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांना रुग्णांना स्थिर करण्यासाठी किंवा आवश्यक चाचण्या करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकला नाही. उष्माघाताने मृत्यू झाला का?

डॉक्टर म्हणाले की, मृत्यूच्या कारणाबाबत भाष्य करणे घाईचे आहे. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांपैकी बहुतेक बांसडीह आणि गडवार भागातील आहेत. अशा स्थितीत चौकशी समितीने या भागातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा मृत्यू उष्माघाताने झाला आहे का, असे विचारले असता म्हणाले की, हे खरे असेल तर गेल्या काही दिवसांत समान किंवा जास्त तापमानाची नोंद झालेल्या इतर जिल्ह्यांतूनही असेच मृत्यू झाले असते. उच्च तापमानामुळे ताप येऊ शकतो. मात्र, रुग्णालयात उन्हाचा सामना करण्यासाठी कुलर आणि इतर व्यवस्था अपुरी असल्याचे त्यांनी मान्य केले.

मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 40% रुग्णांना होता ताप

सीएमओ जयंत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयाच्या नोंदीनुसार, 54 मृत्यूंपैकी 40% रुग्णांना ताप होता, तर 60% रुग्णांना इतर आजारांनी ग्रासले होते. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ दोन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, सीएमएस एसके यादव म्हणाले की, दररोज सुमारे 125 ते 135 रुग्ण दाखल होत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णालयावर दबाव आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलTemperatureतापमान