शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

छातीत दुखतंय, श्वास घेण्यास त्रास अन् ताप…; रुग्णालयात रुग्णांच्या रांगा, 4 दिवसांत 57 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 11:12 IST

उपचारासाठी येणाऱ्या बहुतेक रुग्णांनी प्रथम छातीत दुखणे, श्वासोच्छवासाचा त्रास आणि नंतर ताप आल्याची तक्रार केली.

उत्तर प्रदेशातील बलियामध्ये उष्णतेने कहर सुरूच आहे. येथे उष्णतेच्या लाटेने गेल्या चार दिवसांत 57 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, उष्माघाताने दोनच जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. उर्वरित अहवाल तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. मृत्यूचं नेमकं कारण काय? हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, उपचारासाठी येणारे बहुतेक रुग्ण प्रथम छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार करतात. यानंतर ताप येतो.

लखनौचे आरोग्य संचालक डॉ. एके. सिंह यांनी वाढत्या उष्णतेमुळे रुग्णांच्या मृत्यूच्या वाढत्या संख्येवर सांगितले की, उपचारासाठी येणाऱ्या बहुतेक रुग्णांनी प्रथम छातीत दुखणे, श्वासोच्छवासाचा त्रास आणि नंतर ताप आल्याची तक्रार केली. आम्ही यूरीन टेस्ट, ब्लड टेस्ट आणि अन्य टेस्ट घेत आहोत. बाकीचे रुग्ण घाबरून रुग्णालयात पोहोचले. इतर दाखल झालेल्या रुग्णांमध्ये अशा लोकांचाही समावेश होतो ज्यांना आधीच आजार झाला होता. आम्ही नमुने घेत आहोत, त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल.

दुसरीकडे लखनऊहून आरोग्य विभागाचे एक पथकही रुग्णांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी बलिया येथे पोहोचले आहे. रविवारी बलिया जिल्हा रुग्णालयातील वॉर्डांची तपासणी करणारे संचालक (संसर्गजन्य रोग) डॉ. एके. सिंह आणि संचालक केएन तिवारी यांनी उष्णतेमुळे मृत्यू होण्याची शक्यता नाकारली.

रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर डॉ. ए.के. सिंग म्हणाले की, मृत्यूची संख्या चिंताजनक आहे, परंतु बहुतांश घटनांमध्ये रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांतच मृत्यू झाले आहेत. सिंह म्हणाले की, बहुतेक प्रकरणांमध्ये, प्रवेशानंतर दोन ते सहा तासांच्या दरम्यान मृत्यू झाला. आमच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांना रुग्णांना स्थिर करण्यासाठी किंवा आवश्यक चाचण्या करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकला नाही. उष्माघाताने मृत्यू झाला का?

डॉक्टर म्हणाले की, मृत्यूच्या कारणाबाबत भाष्य करणे घाईचे आहे. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांपैकी बहुतेक बांसडीह आणि गडवार भागातील आहेत. अशा स्थितीत चौकशी समितीने या भागातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा मृत्यू उष्माघाताने झाला आहे का, असे विचारले असता म्हणाले की, हे खरे असेल तर गेल्या काही दिवसांत समान किंवा जास्त तापमानाची नोंद झालेल्या इतर जिल्ह्यांतूनही असेच मृत्यू झाले असते. उच्च तापमानामुळे ताप येऊ शकतो. मात्र, रुग्णालयात उन्हाचा सामना करण्यासाठी कुलर आणि इतर व्यवस्था अपुरी असल्याचे त्यांनी मान्य केले.

मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 40% रुग्णांना होता ताप

सीएमओ जयंत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयाच्या नोंदीनुसार, 54 मृत्यूंपैकी 40% रुग्णांना ताप होता, तर 60% रुग्णांना इतर आजारांनी ग्रासले होते. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ दोन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, सीएमएस एसके यादव म्हणाले की, दररोज सुमारे 125 ते 135 रुग्ण दाखल होत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णालयावर दबाव आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलTemperatureतापमान