शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

काँग्रेस बुडवण्यासाठी इतर कुणाचीही गरज नाही, राहुल-प्रियांकाच पुरेसे; CM योगींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 10:01 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, प्रत्येक गुन्हेगाराला कायद्याचा धाक असला पाहिजे. यापूर्वी उत्तर प्रदेशात अराजकता शिगेला पोहोचली होती. गेल्या ५ वर्षात एकही दंगल झाली नाही, आता कर्फ्यू लागत नाही.

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी (Rahul Gandhi and Priyanka Gandhi) यांच्यावर जबरदस्त प्रहार केला. यामुळे काँग्रेसचा तिळपापड उडाला आहे. ANI ला दिलेल्या एका मुलाखतीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या सरकारची पाठ थोपटताना काँग्रेसवर जबरदस्त निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाऊ-बहीण म्हणत राहुल आणि प्रियांका गांधी यांनाही टोला लगावला. उत्तर प्रदेशात आज दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे.

विरोधकांना विकास पाहवेना...-काँग्रेससंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेसला बुडवण्यासाठी इतर कुणाचीही गरज नाही, हे भाऊ-बहीण पुरेसे आहेत. आज उत्तर प्रदेशात जेवढ्या शांततेत निवडणुका होत आहेत, तेवढ्या शांततेत यापूर्वी कधीही झाल्या नाही. आमच्या सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष देण्यात आले. राज्याचा होत असलेला विकास विरोधकांना पाहावला जात नाही. यामुळेच ते अर्थहीन बडबड करत आहेत.

कायद्याचा धाक असायलाच हवा -मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, प्रत्येक गुन्हेगाराला कायद्याचा धाक असला पाहिजे. यापूर्वी उत्तर प्रदेशात अराजकता शिगेला पोहोचली होती. गेल्या ५ वर्षात एकही दंगल झाली नाही, आता कर्फ्यू लागत नाही. आज उत्तर प्रदेशात कांवड यात्रा मोठ्या दिमाखात निघते. श्रद्धेचा आदर केला जातो. अखिलेश यादव यांनाही आझम खान बाहेर निघावेत, असे वाटत नाही. कारण त्यांची खुर्ची धोक्यात येईल. आझम खान अथवा इतर कुठलीही प्रकरणे न्यायालयाशी संबंधित आहेत, राज्य सरकार कुणालाही जामीन देत नाही.

उत्तर प्रदेशात 55 जागांवर मतदान - आज विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यात मतदान सुरू आहे. यूपीतील 55 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. याशिवाय गोवा आणि उत्तराखंडच्या सर्व विधानसभा जागांसाठी आज मतदान होत आहे. निवडणुकीचा हा टप्पा सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. अनेक दिग्गजांची विश्वासार्हता पणाला लागली आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस